शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मुलाने घेतला गळफास, बापानेही संपविले जीवन

By | Updated: December 5, 2020 04:07 IST

वीरगाव ( जि. औरंगाबाद ) : वैजापूर तालुक्यातील गोयगाव परिसरातील कागोणी शिवारात घरगुती वादातून मुलाने गळफास घेतला, तर दुसऱ्या ...

वीरगाव ( जि. औरंगाबाद ) : वैजापूर तालुक्यातील गोयगाव परिसरातील कागोणी शिवारात घरगुती वादातून मुलाने गळफास घेतला, तर दुसऱ्या दिवशी बापाने विषारी औषध पिऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. बुधवारी आणि गुरुवारी रात्री या घटना घडल्या असून यात सुरेश कैलास मोटे (२२) व कैलास अप्पासाहेब मोटे (५५) या बाप-लेकांनी आपले आयुष्य संपवले.

कागोणी शिवारातील गट क्रमांक ४० मध्ये मोटे यांची साडेचार एकर शेती आहे. बुधवारी कांद्याला पाणी देण्याच्या मुद्द्यावरून मुलगा सुरेश आणि त्याचे वडील कैलास मोटे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सुरेश घरातून निघून गेला होता. त्यांच्या शेतातील तलावाजवळ त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री त्याचा अंत्यविधी झाल्यावर त्याचे वडील कैलास मोटे हे घरातून बेपत्ता झाले. शुक्रवारी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांची मोटारसायकल, विषारी औषधाचा डबा आणि चपला आढळून आल्या. याची दखल घेत वांजरगाव येथील सुरेश लहिरे, सुभाष लहिरे व कागोणीचे पोलीस पाटील मच्छिंद्र धनाड यांच्यासह ग्रामस्थांनी कैलास मोटे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-- फोटो