शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काहींनी नोकरी, करिअरमुळे तर काहींनी गर्भात दोष असल्याने केला गर्भपात, वर्षभरात ४९० केस

By संतोष हिरेमठ | Updated: January 25, 2024 17:39 IST

गर्भपातांच्या संख्येत किंचित घट : कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात

छत्रपती संभाजीनगर : नोकरी करायची आहे, करिअर घडवायचे आहे. पहिले बाळ अजून लहान आहे, आता लगेच दुसरे बाळ नको, यासह अनेक कारणांनी नको असलेला गर्भ काढून टाकला जातो. एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या वर्षभरात ४९० गर्भपात झाले.

गर्भपात म्हटले की, अगदी हळू आवाजात बोलले जाते. मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या संशयित नजरेनेही पाहिले जाते. मात्र, गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही. कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात केले जातात. एकट्या घाटीत महिन्याला ४० ते ४५ गर्भपात होतात.

कायदेशीर गर्भपाताची कारणे काय? गर्भनिरोधक उपाय करूनही गर्भ राहिलेला असेल, तसेच इतर काही कारणांमुळे वैद्यकीय सल्ल्याने आणि कायदेशीररीत्या गर्भपात करता येतो. गरोदरपणात सोनोग्राफी केल्यानंतर गर्भात व्यंग असल्याचे निदान झाल्यानंतरही वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात केले जातात. २०२२च्या तुलनेत झाली घट घाटीत २०२२ मध्ये ५२७ गर्भपात झाले होते. या तुलनेत २०२३ मध्ये गर्भपाताचे प्रमाण कमी राहिले. तर २०२१ मध्ये ४०७ गर्भपात झाले होते.

किती आठवड्यांपर्यंत करता येतो गर्भपातगरोदरपणाच्या २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो. गरोदरपणाच्या २० ते २४ आठवड्यांदरम्यान गर्भात काही व्यंगांचे निदान झाले तर गर्भपातासाठी पूर्वी न्यायालयात जावे लागत असे. पण, आता डाॅक्टरच गर्भपाताची परवानगी देऊ शकतात.

दोष, व्यंग असल्याने सर्वाधिक गर्भपातवैद्यकीय सल्ल्यानुसार आणि कायदेशीर बाबी पाळून गर्भपात करण्यात येतात. गर्भातील बाळात दोष, व्यंग असल्याने गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या वर्षभरात घाटी रुग्णालयात ४९० गर्भपात झाले. यात २० ते २४ आठवड्यांतील ८१ गर्भपात झाले.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाप्रमुख, घाटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPregnancyप्रेग्नंसी