शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वृक्षारोपणाची घाई 'मातीत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:22 IST

औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या माती कामात रस्त्याच्या कडेने नव्याने लागवड करण्यात आलेली झाडे दाबली जात असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जुनी झाडे तोडण्यात आल्यावर लगेचच वृक्षलागवडीची केलेली घाई वायफळ जाणार आहे. शिवाय पुन्हा झाडे लावण्याची नामुष्की ओढावली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रशासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.

गजानन काटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवडोदबाजार : औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या माती कामात रस्त्याच्या कडेने नव्याने लागवड करण्यात आलेली झाडे दाबली जात असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जुनी झाडे तोडण्यात आल्यावर लगेचच वृक्षलागवडीची केलेली घाई वायफळ जाणार आहे. शिवाय पुन्हा झाडे लावण्याची नामुष्की ओढावली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रशासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.पाथ्री येथे नव्यानेच निर्माण झालेल्या स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान यांच्या वतीने औरंगाबाद -जळगाव राज्य महामार्गावरील पाल फाट्यापासून ते वडोदबाजार कमानीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ३ हजार झाडे लावण्यात आली.एकीकडे रस्ता रुंदीकरणाच्या आड येत असलेली झाडे तोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावलेला असताना दुसरीकडे वृक्ष लागवड करण्यात येत होती. परंतु रस्ता रुंदीकरणाच्या आधीच लावलेली झाडे व्यवस्थित मोजमाप करुन न लावली गेल्याने बहुतेक ठिकाणी सदरची झाडे रस्त्याच्या सुरु असलेल्या माती कामात झाकून जात आहेत.त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सदरच्या झाडांची देखभाल व सुकलेल्या झाडांच्या जागी नवीन रोपटे लावण्यासाठी मजुरांवर व रोपांवर केलेला खर्च वाया जाणार आहे. विशेष म्हणजे सदरच्या झाडांना पाणी टाकण्यासाठी मागील महिन्यात चक्क सरकारी वाहनातून पाणी पुरविण्यात आले होते.आता सदरच्या रोपट्यांना पालवी फुटण्याआधीच त्यांचे अस्तित्व गायब होऊ लागले आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी साधारणपणे प्रत्येकी ८ मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. जेसीबी व पोकलॅन यंत्राच्या साह्याने रोडलगतची माती काढून साफसफाई केली जात आहे. साफसफाई दरम्यान निघालेल्या मातीत लागवड केलेली झाडे दाबली जात आहेत. त्यामुळे सदरची झाडे पुन्हा जिवंत होणे मुश्किल वाटत आहे. रस्त्याचे काम करणाºया यंत्रणेने सांगितले की, आम्ही आमच्या मोजमापाप्रमाणेच काम करीत आहोत. परंतु बहुतेक ठिकाणी सदरची झाडे कमी अधिक फरकाने लागवड झालेली असल्याने ती मातीआड झाकली जात आहेत.