शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

वृक्षारोपणाची घाई 'मातीत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:22 IST

औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या माती कामात रस्त्याच्या कडेने नव्याने लागवड करण्यात आलेली झाडे दाबली जात असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जुनी झाडे तोडण्यात आल्यावर लगेचच वृक्षलागवडीची केलेली घाई वायफळ जाणार आहे. शिवाय पुन्हा झाडे लावण्याची नामुष्की ओढावली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रशासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.

गजानन काटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवडोदबाजार : औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या माती कामात रस्त्याच्या कडेने नव्याने लागवड करण्यात आलेली झाडे दाबली जात असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जुनी झाडे तोडण्यात आल्यावर लगेचच वृक्षलागवडीची केलेली घाई वायफळ जाणार आहे. शिवाय पुन्हा झाडे लावण्याची नामुष्की ओढावली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रशासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.पाथ्री येथे नव्यानेच निर्माण झालेल्या स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान यांच्या वतीने औरंगाबाद -जळगाव राज्य महामार्गावरील पाल फाट्यापासून ते वडोदबाजार कमानीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ३ हजार झाडे लावण्यात आली.एकीकडे रस्ता रुंदीकरणाच्या आड येत असलेली झाडे तोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावलेला असताना दुसरीकडे वृक्ष लागवड करण्यात येत होती. परंतु रस्ता रुंदीकरणाच्या आधीच लावलेली झाडे व्यवस्थित मोजमाप करुन न लावली गेल्याने बहुतेक ठिकाणी सदरची झाडे रस्त्याच्या सुरु असलेल्या माती कामात झाकून जात आहेत.त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सदरच्या झाडांची देखभाल व सुकलेल्या झाडांच्या जागी नवीन रोपटे लावण्यासाठी मजुरांवर व रोपांवर केलेला खर्च वाया जाणार आहे. विशेष म्हणजे सदरच्या झाडांना पाणी टाकण्यासाठी मागील महिन्यात चक्क सरकारी वाहनातून पाणी पुरविण्यात आले होते.आता सदरच्या रोपट्यांना पालवी फुटण्याआधीच त्यांचे अस्तित्व गायब होऊ लागले आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी साधारणपणे प्रत्येकी ८ मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. जेसीबी व पोकलॅन यंत्राच्या साह्याने रोडलगतची माती काढून साफसफाई केली जात आहे. साफसफाई दरम्यान निघालेल्या मातीत लागवड केलेली झाडे दाबली जात आहेत. त्यामुळे सदरची झाडे पुन्हा जिवंत होणे मुश्किल वाटत आहे. रस्त्याचे काम करणाºया यंत्रणेने सांगितले की, आम्ही आमच्या मोजमापाप्रमाणेच काम करीत आहोत. परंतु बहुतेक ठिकाणी सदरची झाडे कमी अधिक फरकाने लागवड झालेली असल्याने ती मातीआड झाकली जात आहेत.