शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

वृक्षारोपणाची घाई 'मातीत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:22 IST

औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या माती कामात रस्त्याच्या कडेने नव्याने लागवड करण्यात आलेली झाडे दाबली जात असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जुनी झाडे तोडण्यात आल्यावर लगेचच वृक्षलागवडीची केलेली घाई वायफळ जाणार आहे. शिवाय पुन्हा झाडे लावण्याची नामुष्की ओढावली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रशासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.

गजानन काटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवडोदबाजार : औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या माती कामात रस्त्याच्या कडेने नव्याने लागवड करण्यात आलेली झाडे दाबली जात असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जुनी झाडे तोडण्यात आल्यावर लगेचच वृक्षलागवडीची केलेली घाई वायफळ जाणार आहे. शिवाय पुन्हा झाडे लावण्याची नामुष्की ओढावली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रशासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.पाथ्री येथे नव्यानेच निर्माण झालेल्या स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान यांच्या वतीने औरंगाबाद -जळगाव राज्य महामार्गावरील पाल फाट्यापासून ते वडोदबाजार कमानीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ३ हजार झाडे लावण्यात आली.एकीकडे रस्ता रुंदीकरणाच्या आड येत असलेली झाडे तोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावलेला असताना दुसरीकडे वृक्ष लागवड करण्यात येत होती. परंतु रस्ता रुंदीकरणाच्या आधीच लावलेली झाडे व्यवस्थित मोजमाप करुन न लावली गेल्याने बहुतेक ठिकाणी सदरची झाडे रस्त्याच्या सुरु असलेल्या माती कामात झाकून जात आहेत.त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सदरच्या झाडांची देखभाल व सुकलेल्या झाडांच्या जागी नवीन रोपटे लावण्यासाठी मजुरांवर व रोपांवर केलेला खर्च वाया जाणार आहे. विशेष म्हणजे सदरच्या झाडांना पाणी टाकण्यासाठी मागील महिन्यात चक्क सरकारी वाहनातून पाणी पुरविण्यात आले होते.आता सदरच्या रोपट्यांना पालवी फुटण्याआधीच त्यांचे अस्तित्व गायब होऊ लागले आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी साधारणपणे प्रत्येकी ८ मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. जेसीबी व पोकलॅन यंत्राच्या साह्याने रोडलगतची माती काढून साफसफाई केली जात आहे. साफसफाई दरम्यान निघालेल्या मातीत लागवड केलेली झाडे दाबली जात आहेत. त्यामुळे सदरची झाडे पुन्हा जिवंत होणे मुश्किल वाटत आहे. रस्त्याचे काम करणाºया यंत्रणेने सांगितले की, आम्ही आमच्या मोजमापाप्रमाणेच काम करीत आहोत. परंतु बहुतेक ठिकाणी सदरची झाडे कमी अधिक फरकाने लागवड झालेली असल्याने ती मातीआड झाकली जात आहेत.