शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

पिकली पानेच ठरताहेत सॉफ्ट टार्गेट

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

नांदेड : खुनासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तर त्याचबरोबर सोनसाखळी, लुबाडणे आदी घटनांमध्ये ज्येष्ठ नागरीकांनाच अधिक लक्ष केले जात असल्याचे उघडकीस आले आहे़

नांदेड : खुनासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तर त्याचबरोबर सोनसाखळी, लुबाडणे आदी घटनांमध्ये ज्येष्ठ नागरीकांनाच अधिक लक्ष केले जात असल्याचे उघडकीस आले आहे़ क्राईम रेकार्डस ब्युरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २००७ पासून महाराष्ट्रात १ हजार ६७९ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले आहेत़ नांदेडातही अशा खुनाच्या घटना घडल्या आहेत़ कधी एकटे राहत असल्याचे पाहून त्यांचे घर लुटले जाते़ तर कधी रस्त्यावर अडवून पोलिस असल्याचे भासवून त्यांना लुबाडले जाते़ स्थावर मालमत्तेच्या प्रकरणात तर नात्यातीलच व्यक्ती या हतबल वृद्धांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवित असल्याचे अनेक उदाहरणे पहावयास मिळाली़ नांदेडात तर असे प्रकार सर्रासपणे पहावयास मिळतात़ सकाळी किंवा सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या या पिकल्या पानांना भामटे अतिशय अलगदपणे टार्गेट करतात़ मुलाबाळांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आयुष्यभर झटणार्‍या या पिकल्या पानांना आता उरलेल्या आयुष्यातही हिंसक संघर्षाचा सामना करावा लागत आहे़ अशा गुन्ह्याच्या प्रमाणात महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात १४० टक्कयांनी वाढ झाली आहे़ याबाबत पोलिस दलाकडून वृद्धांसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे़ परंतु महिला हिंसाचार याबरोबरच वृद्धांसाठी असलेली हेल्पलाईन नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे याबाबतीत तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे़ आर्थिक फसवणुकीत ज्येष्ठांचाच बळी आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठांचाच सर्वाधिक समावेश असल्याची बाब समोर आली आहे़ रिझर्व्ह बँक आणि सेबीने खोट्या मोहाला, आमिषांना बळी पडू नका असा सावधानतेचा इशारा दिला होता़ मात्र तरीदेखील बोगस कंपन्यामध्ये पैसे गुंतविणे सुरुच आहे़ हे सर्व भामटे उच्चशिक्षित असून भोळ्याभाबड्या ज्येष्ठांनाच जाळ्यात ओढतात़ घर का भेदीच जास्त धोकादायक मुले बाहेरगावी किंवा परदेशी असल्याने घरामध्ये एकटेच राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता हे मोठेच आव्हान आहे़ ज्येष्ठ महिला कौटुंबिक छळापासून साखळी चोरांचे लक्ष्य ठरत आहेत़ विशेष म्हणजे नात्यातील व्यक्ती ज्येष्ठ नागरीकांच्या छळास कारणीभूत ठरत आहेत़ कायदा काय सांगतो? फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १२५ कलमान्वये पालकांचा सांभाळ व निर्वाहासाठी लागणार्‍या पैशांची पूर्तता करण्याची जबाबदारी मुलगा आणि मुलगी या दोघांवर असते़ हा निर्वाहभत्ता न दिल्यास दंड आणि कारावासाची शिक्षा संबंधितांना होवू शकते़ त्याचबरोबर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किंवा कौटुंबिक न्यायालयातही ज्येष्ठ नागरिक फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १२५ कलमान्वये अर्ज करु शकतात़ सुशिक्षितांचा गुन्हेगारी फॉर्म्युला गेल्या काही वर्षांत आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे लोकांना फसवायचे नवेच तंत्र गुन्हेगारांना मिळाले आहे़ परिणामी सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे़ सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमाणकारक यंत्रणाही नाही़ त्यामुळे इंटरनेटद्वारे फसविणार्‍यांची संख्या वाढतच आहे़ लोकांना अधिक नफा, व्याजाचे आमिष दाखविणार्‍या खोट्या कंपन्या काढल्या गेल्या़ पद्धतशीरपणे त्याचे दिवाळे काढून गुंतवणुकदारांना बुडवून हे भामटे पसार होतात़