शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
3
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
4
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
6
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
7
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
10
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
11
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
12
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
13
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
15
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
16
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
17
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
18
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
19
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
20
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय संकटात-तिवारी

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नांदेड: सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गोरक्षणाच्या नावाखाली माणसांच्या खुलेआम हत्या केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय ताब्यात घेतल्या जात आहेत़ आम आदमीच्या सुविधा काढल्या जात आहेत़, असे असतानाही सगळीकडे शांतता आहे़ सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़ प्रगतिशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या पाचव्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ देशात सुरू असलेल्या वाढत्या हिंसक कारवायांसंदर्भात चिंता व्यक्त करताना तिवारी म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती महोत्सव देशभर साजरा करण्यात आला़ आज गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम व दलितांची खुलेआम हत्या होत आहेत़ नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला़ आम आदमीच्या रेल्वेतील सुविधा काढण्यात आल्या आहेत़ असे असतानाही लोक शांतच राहिले़ हे मोठे कोडे असल्याचेही तिवारी म्हणाले़या संमेलनाची भूमिका मांडताना डॉ़ श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, संमेलन संस्कृतीला वेगळे वळण देणारे हे संमेलन असून वैचारिक भूूक भागविण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समृद्ध वैचारिक वारसा आहे, त्याचा जागर करण्यासाठी व समकालीन वास्तव बदलण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ संयोजक नयन बाराहाते म्हणाले, भारतातील सर्वांवर हिंदू राज्य लादण्याची भाषा आजचा शासक वर्ग करीत आहे़ हिंदू राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती एक भयानक आपत्ती असेल, यात संशय नाही़ हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे़ म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदू राज्य घडू देता कामा नये, असे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते़ त्याचे स्मरण करणे या संमेलनाच्या निमित्ताने गरजेचे आहे़ सूत्रसंचालन डॉ़ पी़ विठ्ठल यांनी केले़ मान्यवरांचे स्वागत राम शेवडीकर, प्रा़ डॉ़ यशपाल भिंगे, प्रा़ डॉ़ केशव सखाराम देशमुख, रेवती गव्हाणे, डॉ़ रवी सरोदे, सतीश कुलकर्णी, डॉ़ करूणा जमदाडे यांनी केले़ कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती़