शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

सामाजिक न्याय संकटात-तिवारी

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नांदेड: सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गोरक्षणाच्या नावाखाली माणसांच्या खुलेआम हत्या केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय ताब्यात घेतल्या जात आहेत़ आम आदमीच्या सुविधा काढल्या जात आहेत़, असे असतानाही सगळीकडे शांतता आहे़ सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़ प्रगतिशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या पाचव्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ देशात सुरू असलेल्या वाढत्या हिंसक कारवायांसंदर्भात चिंता व्यक्त करताना तिवारी म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती महोत्सव देशभर साजरा करण्यात आला़ आज गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम व दलितांची खुलेआम हत्या होत आहेत़ नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला़ आम आदमीच्या रेल्वेतील सुविधा काढण्यात आल्या आहेत़ असे असतानाही लोक शांतच राहिले़ हे मोठे कोडे असल्याचेही तिवारी म्हणाले़या संमेलनाची भूमिका मांडताना डॉ़ श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, संमेलन संस्कृतीला वेगळे वळण देणारे हे संमेलन असून वैचारिक भूूक भागविण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समृद्ध वैचारिक वारसा आहे, त्याचा जागर करण्यासाठी व समकालीन वास्तव बदलण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ संयोजक नयन बाराहाते म्हणाले, भारतातील सर्वांवर हिंदू राज्य लादण्याची भाषा आजचा शासक वर्ग करीत आहे़ हिंदू राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती एक भयानक आपत्ती असेल, यात संशय नाही़ हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे़ म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदू राज्य घडू देता कामा नये, असे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते़ त्याचे स्मरण करणे या संमेलनाच्या निमित्ताने गरजेचे आहे़ सूत्रसंचालन डॉ़ पी़ विठ्ठल यांनी केले़ मान्यवरांचे स्वागत राम शेवडीकर, प्रा़ डॉ़ यशपाल भिंगे, प्रा़ डॉ़ केशव सखाराम देशमुख, रेवती गव्हाणे, डॉ़ रवी सरोदे, सतीश कुलकर्णी, डॉ़ करूणा जमदाडे यांनी केले़ कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती़