शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

सामाजिक न्याय संकटात-तिवारी

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नांदेड: सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गोरक्षणाच्या नावाखाली माणसांच्या खुलेआम हत्या केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय ताब्यात घेतल्या जात आहेत़ आम आदमीच्या सुविधा काढल्या जात आहेत़, असे असतानाही सगळीकडे शांतता आहे़ सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़ प्रगतिशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या पाचव्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ देशात सुरू असलेल्या वाढत्या हिंसक कारवायांसंदर्भात चिंता व्यक्त करताना तिवारी म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती महोत्सव देशभर साजरा करण्यात आला़ आज गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम व दलितांची खुलेआम हत्या होत आहेत़ नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला़ आम आदमीच्या रेल्वेतील सुविधा काढण्यात आल्या आहेत़ असे असतानाही लोक शांतच राहिले़ हे मोठे कोडे असल्याचेही तिवारी म्हणाले़या संमेलनाची भूमिका मांडताना डॉ़ श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, संमेलन संस्कृतीला वेगळे वळण देणारे हे संमेलन असून वैचारिक भूूक भागविण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समृद्ध वैचारिक वारसा आहे, त्याचा जागर करण्यासाठी व समकालीन वास्तव बदलण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ संयोजक नयन बाराहाते म्हणाले, भारतातील सर्वांवर हिंदू राज्य लादण्याची भाषा आजचा शासक वर्ग करीत आहे़ हिंदू राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती एक भयानक आपत्ती असेल, यात संशय नाही़ हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे़ म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदू राज्य घडू देता कामा नये, असे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते़ त्याचे स्मरण करणे या संमेलनाच्या निमित्ताने गरजेचे आहे़ सूत्रसंचालन डॉ़ पी़ विठ्ठल यांनी केले़ मान्यवरांचे स्वागत राम शेवडीकर, प्रा़ डॉ़ यशपाल भिंगे, प्रा़ डॉ़ केशव सखाराम देशमुख, रेवती गव्हाणे, डॉ़ रवी सरोदे, सतीश कुलकर्णी, डॉ़ करूणा जमदाडे यांनी केले़ कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती़