शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

...तर मग महापालिका सील करणार का ?

By | Updated: November 27, 2020 04:02 IST

औरंगाबाद : महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो लोक विना मास्क फिरतात मग काय तुम्ही महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय १५ दिवस ...

औरंगाबाद : महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो लोक विना मास्क फिरतात मग काय तुम्ही महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय १५ दिवस सील करणार का? असा सवाल व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी बैठक घेतली. शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मास्क न घालता येणाऱ्या ग्राहकाला सामान देताना आढळून आल्यास त्या संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल व १५ दिवस दुकान सील करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. या संदर्भात व्यापारी महासंघाचे महासचिव लक्ष्मीनारायण राठी यांना विचारले असता त्यांनी प्रतिसवाल केला की, कोणत्या ना कोणत्या कामामुळे दररोज महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो लोक विना मास्क ये- जा करीत असतात. मग काय प्रशासक मनपा कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय १५ दिवस सील करणार का. सर्व व्यापारी स्वतःची व ग्राहकांची काळजी घेत आहेत. पण काही ग्राहक असे आहेत की, ते विना मास्क येतात व त्यांना अडवले तर ते भांडण करतात. अशा ग्राहकांना रोखण्यासाठी दुकानदार काय करणार.

महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, ग्राहक ऐकत नसेल, विना मास्क फिरत असेल तर त्याचा दंड दुकानदाराला कशासाठी. काही झाले तरी दुकानदारावर कारवाई केली जाते. हे अन्यायकारक आहे. मनपाने व पोलिसांनी शहरातील विविध भागात काही दिवस एकत्रित मोहीम राबवून विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मग ती व्यक्ती कोणीही असो. मात्र, दुकाने १५ दिवस बंद ठेवणे हे अन्यायकारक आहे.