शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

आतापर्यंत ४४% पेरणी

By admin | Updated: July 3, 2016 00:46 IST

औरंगाबाद : जून महिना संपला तरी जिल्ह्यात अजून निम्म्या क्षेत्रावरही खरिपाची पेरणी झालेली नाही. १ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४४ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

औरंगाबाद : जून महिना संपला तरी जिल्ह्यात अजून निम्म्या क्षेत्रावरही खरिपाची पेरणी झालेली नाही. १ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४४ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी पेरणी ही वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात झाली आहे.जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत सरासरी १३९ मि. मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ ७९ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला आहे. २२ जूनपर्यंत जिल्ह्यात पेरण्यांना सुरुवातच झालेली नव्हती. मात्र, त्यानंतर आठवडाभरात काही प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर पेरण्यांना सुरुवात झाली. असे असले तरी अजूनही अनेक भागांत पेरणीसारखा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील पेरण्या खोळंबल्या आहेत. विशेषत: गंगापूर आणि खुलताबाद या दोन तालुक्यांमध्ये तर पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत केवळ ४४ टक्के क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी पेरणीयोग्य क्षेत्र ७ लाख ३६ हजार हेक्टर इतके आहे. आतापर्यंत त्यातील ३ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र हे कपाशीचे आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. हे प्रमाण ४६ टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे मका पिकाचाही निम्माच पेरा होऊ शकला आहे. जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ५७ हजार हेक्टर इतके आहे. आतापर्यंत ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे. याशिवाय तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांची अजून अत्यल्प क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. पेरणीमध्ये फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड आणि औरंगाबाद तालुक्यामध्ये सरासरी ६० ते ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कन्नड तालुक्यात ५० टक्के आणि पैठण तालुक्यात ५५ टक्केक्षेत्रावर पेरणी झाली आहे.