शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून चरस बाळगल्याच्या गुन्ह्यात सशर्त जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 14:15 IST

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३७ नुसार एक किलो आणि त्यापेक्षा जादा प्रमाणात चरस बाळगणे म्हणजे व्यापाराच्या उद्देशाने बाळगणे असे नमूद केले आहे.

औरंगाबाद : अल्प प्रमाणात चरस बाळगल्याच्या गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडिया यांनी अर्जदार सय्यद नजिरोद्दीन सय्यद रियाजोद्दीन (रा. कटकट गेट) याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला.

२४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नजिरोद्दीन याच्याकडून १०१ ग्राम चरस जप्त केले होते. न्यायालयाने त्याला २५ ते २७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पोलीस कोठडी सुनावली होती. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३७ नुसार एक किलो आणि त्यापेक्षा जादा प्रमाणात चरस बाळगणे म्हणजे व्यापाराच्या उद्देशाने बाळगणे असे नमूद केले आहे. वस्तुत: नजिरोद्दीनकडे १०१ ग्रॅम म्हणजे अल्प प्रमाणात चरस आढळले असून त्याला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली होती. म्हणून तपासास पुरेसा वेळ दिला असल्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले. आरोपीतर्फे ॲड. जी.एस. मुंदडा यांनी काम पाहिले.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सशर्त अटकपूर्व जामीनअल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी हृषीकेश भागचंद मोगल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रकाश डी. नाईक यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. हृषीकेश तक्रारदार मुलीचा पाठलाग करून सतत तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. घटनेच्या दिवशी १२ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने मुलीचा हात ओढून तिला जबरदस्ती दुचाकीवर बसण्याचा प्रयत्न केल्यावरून त्याच्याविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याने ॲड. ए. एन. राऊत यांच्यामार्फत खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयDrugsअमली पदार्थ