शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

दिवसाला अडीच हजार झाडांची तस्करी

By admin | Updated: April 16, 2016 23:27 IST

बीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत.

व्यंकटेश वैष्णव / राजेश खराडेल्ल बीडबीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत. दहा वर्षात येथील वृक्षांचे काय झाले ? हे दस्तुरखुद्द वनविभाग देखील सांगू शकत नाही, हे वास्तव आहे.दिवसाला अडीच हजार वृक्षांची तस्करी केली जात आहे. हा प्रकार जिल्हा प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. सिंचन, पाणी या विषयावर मोठी चर्चा होते. मात्र, वृक्ष लागवड, संगोपनावर कोणीच पुढे येत नाही. जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील वृक्षमित्र सुधाकर देशमुख हे मागील २७ वर्षांपासून वृक्ष वाचविण्यासाठी एकाकी झुंज देत आहेत. आता शेतकऱ्यांना वृक्ष संगोपनासाठी शासनाने अनुदान देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन लोढा यांनी केली.वर्षभरात केवळ ६८ कारवायाअवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या ६८ जणांवर वनविभागीय कार्याकडून कारवाया झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर अथपूर्ण हेतूमुळे वनरक्षक, वनमजूर यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. वनरक्षक, मोबाईल स्कॉड तसेच पोलीस प्रशासनाचे व वनविभागाचे खबरे असूनही केवळ ६८ कारवाया झाल्या आहेत.लागवड करूनही मिळेना उभारी२०१३ ते २०१८ या कालावधीत शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सुरवातीच्या दोन वर्षात २३ लाख वृक्षलागवड केली असल्याचा निर्वाळा वनविभागाने दिला आहे. लागवड झाली असली तरी त्याची जोपासना होत नसल्याने योजनेला उभारी मिळेना झाली आहे. चालू वर्षात १४६४ हेक्टरावर १६ लाख २५ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार कामे सुरू असल्याचे वन विभागीय अधिकारी आर.आर.काळे यांनी सांगितले. वनक्षेत्रालगतच्या गावांकडून धोकाअवैध वृक्षतोडीचा धोका अधिकतर वनक्षेत्रालगतच्या गावकऱ्यांकडून होत आहे. वनक्षेत्रालगत जिल्ह्यात १२० गावांचा समावेश आहे. जनजागृतीसाठी समितीही नेमण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांची उदासिनता व ग्रामस्थांची मानसिकता बदलत नसल्याने वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वृक्षतोडीवरील भार कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वनक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांना एल.पी.जी. गॅसचे वाटप करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत ३७० जणांना याचे वाटप झाले आहे. गायरानावर अतिक्रमण जिल्ह्यात गायरानाचे क्षेत्र ६२ हजार हेक्टरावर होते. या प्रशासनाच्या जागेवर वृक्षलागवड करून वनक्षेत्रवाढीसाठी उपयोग होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या गायरानावरही नागरिक अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे हे क्षेत्र ४८ हजार हेक्टरावर आले आहे. महसून प्रशासनाचाही धाक राहिलेला नाही. वृक्षलागवडीचा दिखावावनविभागामार्फत वन क्षेत्र वाढविण्याकरिता वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र वृक्षसंवर्धनाबाबत दुर्लक्ष होत असल्याने लागवडीचा खर्च दरवर्षी खेड्डे खोदण्यातच खर्ची होत आहे. केवळ दिखाऊपणा न करिता सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची जाण ठेऊन कामे होणे गरजेचे आहे.जिल्ह्यात अशा प्रकारे विना परवाना वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाते. ठिकठिकाणी झाडांचे ओंडके आढळून येत आहेत. परळी तालुक्यात ओल्या झाडांची साल कापून झाड वाळवले जाते. नंतर सरपणासाठी तोडले जाते.वर्षभराचे उपक्रम आणि जलयुक्त अभियनांतर्गत जलमृदा संधारणाची कामे झाली आहेत. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मंत्र कृतीत उतरिवण्यासाठी वृक्षलागवडीचे पावसाळा हंगामापूर्वीचे नियोजन पूर्ण केले आहे. १ जुलै रोजी जिल्ह्यात विविध विभागांतर्गत ३ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. - आर.आर.काळे, उपविभागीय वनाधिकारी