शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला अडीच हजार झाडांची तस्करी

By admin | Updated: April 16, 2016 23:27 IST

बीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत.

व्यंकटेश वैष्णव / राजेश खराडेल्ल बीडबीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत. दहा वर्षात येथील वृक्षांचे काय झाले ? हे दस्तुरखुद्द वनविभाग देखील सांगू शकत नाही, हे वास्तव आहे.दिवसाला अडीच हजार वृक्षांची तस्करी केली जात आहे. हा प्रकार जिल्हा प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. सिंचन, पाणी या विषयावर मोठी चर्चा होते. मात्र, वृक्ष लागवड, संगोपनावर कोणीच पुढे येत नाही. जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील वृक्षमित्र सुधाकर देशमुख हे मागील २७ वर्षांपासून वृक्ष वाचविण्यासाठी एकाकी झुंज देत आहेत. आता शेतकऱ्यांना वृक्ष संगोपनासाठी शासनाने अनुदान देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन लोढा यांनी केली.वर्षभरात केवळ ६८ कारवायाअवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या ६८ जणांवर वनविभागीय कार्याकडून कारवाया झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर अथपूर्ण हेतूमुळे वनरक्षक, वनमजूर यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. वनरक्षक, मोबाईल स्कॉड तसेच पोलीस प्रशासनाचे व वनविभागाचे खबरे असूनही केवळ ६८ कारवाया झाल्या आहेत.लागवड करूनही मिळेना उभारी२०१३ ते २०१८ या कालावधीत शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सुरवातीच्या दोन वर्षात २३ लाख वृक्षलागवड केली असल्याचा निर्वाळा वनविभागाने दिला आहे. लागवड झाली असली तरी त्याची जोपासना होत नसल्याने योजनेला उभारी मिळेना झाली आहे. चालू वर्षात १४६४ हेक्टरावर १६ लाख २५ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार कामे सुरू असल्याचे वन विभागीय अधिकारी आर.आर.काळे यांनी सांगितले. वनक्षेत्रालगतच्या गावांकडून धोकाअवैध वृक्षतोडीचा धोका अधिकतर वनक्षेत्रालगतच्या गावकऱ्यांकडून होत आहे. वनक्षेत्रालगत जिल्ह्यात १२० गावांचा समावेश आहे. जनजागृतीसाठी समितीही नेमण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांची उदासिनता व ग्रामस्थांची मानसिकता बदलत नसल्याने वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वृक्षतोडीवरील भार कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वनक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांना एल.पी.जी. गॅसचे वाटप करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत ३७० जणांना याचे वाटप झाले आहे. गायरानावर अतिक्रमण जिल्ह्यात गायरानाचे क्षेत्र ६२ हजार हेक्टरावर होते. या प्रशासनाच्या जागेवर वृक्षलागवड करून वनक्षेत्रवाढीसाठी उपयोग होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या गायरानावरही नागरिक अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे हे क्षेत्र ४८ हजार हेक्टरावर आले आहे. महसून प्रशासनाचाही धाक राहिलेला नाही. वृक्षलागवडीचा दिखावावनविभागामार्फत वन क्षेत्र वाढविण्याकरिता वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र वृक्षसंवर्धनाबाबत दुर्लक्ष होत असल्याने लागवडीचा खर्च दरवर्षी खेड्डे खोदण्यातच खर्ची होत आहे. केवळ दिखाऊपणा न करिता सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची जाण ठेऊन कामे होणे गरजेचे आहे.जिल्ह्यात अशा प्रकारे विना परवाना वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाते. ठिकठिकाणी झाडांचे ओंडके आढळून येत आहेत. परळी तालुक्यात ओल्या झाडांची साल कापून झाड वाळवले जाते. नंतर सरपणासाठी तोडले जाते.वर्षभराचे उपक्रम आणि जलयुक्त अभियनांतर्गत जलमृदा संधारणाची कामे झाली आहेत. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मंत्र कृतीत उतरिवण्यासाठी वृक्षलागवडीचे पावसाळा हंगामापूर्वीचे नियोजन पूर्ण केले आहे. १ जुलै रोजी जिल्ह्यात विविध विभागांतर्गत ३ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. - आर.आर.काळे, उपविभागीय वनाधिकारी