शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘स्मार्ट’ चा प्रस्ताव अखेर केंद्राकडे

By admin | Updated: December 17, 2015 00:10 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी मनपाने दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी मनपाने दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला. शासनाने औरंगाबादचा प्रस्ताव बुधवारी केंद्र शासनाकडे सादर केला. औरंगाबादची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली किंवा नाही, आता जानेवारीत कळणार आहे. केंद्र शासन पहिल्या वर्षी निवडण्यात आलेल्या २० शहरांची घोषणा करणार आहे. स्मार्ट सिटीच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने चिकलठाण्यातील जागेची निवड केली आहे. प्रशासनाने राज्य सरकारकडे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केला. चिकलठाण्यालगत हर्सूल सावंगी बायपास परिसरात किमान २५० एकर जागेत अत्याधुनिक टाऊनशिप उभी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावात नमूद आहे. राज्य सरकारकडे हा प्रकल्प अहवाल सादर करण्याची वाढीव मुदत शनिवारी संपली. तत्पूर्वी मनपाने स्मार्ट सिटीच्या विकासासाठी ग्रीनफिल्डचे मॉडेल निवडले. त्यानुसार पीएमसीने नक्षत्रवाडी आणि चिकलठाणा या दोन भागांचे प्रस्ताव तयार केले होते. ग्रीनफिल्ड प्रकारात किमान २५० एकर मोकळ्या जागेत नवीन टाऊनशिप विकसित करणे अपेक्षित आहे. मनपाला नियोजित मुदतीत एका जागेचा प्रस्ताव निवडून तो राज्य सरकारकडे सादर करावयाचा होता. मात्र, दोन्हीपैकी कोणत्या जागेची निवड करायची हे निश्चित होत नव्हते. पालिका प्रशासनाकडून नक्षत्रवाडीच्या जागेला पसंती देण्यात येत होती. तेथे शासकीय मालकीची जमीन असल्यामुळे ती मिळण्यास अडचण येणार नाही, असे प्रशासनाचे मत होते. काही राजकीय मंडळी चिकलठाण्याची निवड व्हावी यासाठी आग्रही होते. त्यामुळे जागेची निवड लांबली होती. शनिवारी सायंकाळी चिकलठाण्याच्या जागेचा पर्याय निश्चित करण्यात आला.