शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

‘स्मार्ट’ चा प्रस्ताव अखेर केंद्राकडे

By admin | Updated: December 17, 2015 00:10 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी मनपाने दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी मनपाने दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला. शासनाने औरंगाबादचा प्रस्ताव बुधवारी केंद्र शासनाकडे सादर केला. औरंगाबादची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली किंवा नाही, आता जानेवारीत कळणार आहे. केंद्र शासन पहिल्या वर्षी निवडण्यात आलेल्या २० शहरांची घोषणा करणार आहे. स्मार्ट सिटीच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने चिकलठाण्यातील जागेची निवड केली आहे. प्रशासनाने राज्य सरकारकडे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केला. चिकलठाण्यालगत हर्सूल सावंगी बायपास परिसरात किमान २५० एकर जागेत अत्याधुनिक टाऊनशिप उभी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावात नमूद आहे. राज्य सरकारकडे हा प्रकल्प अहवाल सादर करण्याची वाढीव मुदत शनिवारी संपली. तत्पूर्वी मनपाने स्मार्ट सिटीच्या विकासासाठी ग्रीनफिल्डचे मॉडेल निवडले. त्यानुसार पीएमसीने नक्षत्रवाडी आणि चिकलठाणा या दोन भागांचे प्रस्ताव तयार केले होते. ग्रीनफिल्ड प्रकारात किमान २५० एकर मोकळ्या जागेत नवीन टाऊनशिप विकसित करणे अपेक्षित आहे. मनपाला नियोजित मुदतीत एका जागेचा प्रस्ताव निवडून तो राज्य सरकारकडे सादर करावयाचा होता. मात्र, दोन्हीपैकी कोणत्या जागेची निवड करायची हे निश्चित होत नव्हते. पालिका प्रशासनाकडून नक्षत्रवाडीच्या जागेला पसंती देण्यात येत होती. तेथे शासकीय मालकीची जमीन असल्यामुळे ती मिळण्यास अडचण येणार नाही, असे प्रशासनाचे मत होते. काही राजकीय मंडळी चिकलठाण्याची निवड व्हावी यासाठी आग्रही होते. त्यामुळे जागेची निवड लांबली होती. शनिवारी सायंकाळी चिकलठाण्याच्या जागेचा पर्याय निश्चित करण्यात आला.