शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

‘स्मार्ट’ला आता ‘सेफ सिटी’ची जोड

By admin | Updated: December 16, 2015 00:15 IST

गणेश खेडकर, औरंगाबाद महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’चा सर्वत्र गाजावाजा सुरू असताना शहर पोलिसांच्या ‘सेफ सिटी’ प्रकल्पाचाही बोलबाला सुरू झाला आहे.

गणेश खेडकर, औरंगाबाद महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’चा सर्वत्र गाजावाजा सुरू असताना शहर पोलिसांच्या ‘सेफ सिटी’ प्रकल्पाचाही बोलबाला सुरू झाला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पहिल्या टप्प्यात पोलिसांनी महत्त्वाची व संवेदनशील ३० ठिकाणे निवडून ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता सध्याचे पोलीस बळ कमी पडत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. मागील काही दिवसांपासून चोऱ्या, घरफोड्या, खून हे प्रकार वाढले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘सेफ सिटी’ हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून महत्त्वाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम आता पोलीस बसल्या जागेवर करू शकतात. ‘सेफ सिटी’सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे वाहतुकीबरोबरच इतर अनेक गोष्टी पोलिसांना थेट समजणार आहेत. ‘सेफ सिटी’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ३० महत्त्वाची व संवेदनशील ठिकाणे निवडून पोलिसांनी ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र ‘कंट्रोल रूम’ स्थापन करून स्वतंत्र कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात येत आहे. या ‘कंट्रोल रूम’मधून सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा जवळपास पूर्णत्वास आला आहे. काही दिवसांमध्ये या ‘सेफ सिटी’चे उद्घाटन करण्यात येणार आहे.