शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांमुळे शहराची पत वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:07 AM

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकासकामांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. नियोजित वेळेतच सर्व ...

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकासकामांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. नियोजित वेळेतच सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराची पत वाढेल, अशी अपेक्षा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केली.

स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावरून सध्या वाद सुरू आहे. यासंदर्भात पाण्डेय म्हणाले की, स्मार्ट सिटीचे सीईओचे पद महापालिका आयुक्तांपेक्षा लहान आहे. प्रशासक किंवा आयुक्तांच्या अधिपत्याखालीच आहे. सीईओला प्रशासक किंवा आयुक्तांच्या आदेशानेच काम करावे लागणार आहे. सध्या स्मार्ट सिटीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत एवढीच आपली अपेक्षा आहे.

शहर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर हा प्रकल्प ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल. महापालिकेसाठीचा ई- गर्व्हनन्स प्रकल्प सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मालमत्ताकर, पाणीपट्टी नागरिकांना ऑनलाईन भरता येईल. कर भरण्यासाठी त्यांना त्रास सहन करावा लागणार नाही. घरबसल्या महापालिकेला किमान ३०० कोटी रुपये प्राप्त होतील. जीआयएस प्रकल्प पुढील वर्षी मार्चअखेर पर्यंत पूर्ण होऊ शकतो. इंटिग्रेटेड सेक्युरिटी अँड सिटी ऑपरेशन हा प्रकल्पदेखील ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे चार प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण झाले तर त्याचा शहर व महापालिकेला लाभ होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पालिका आणि स्मार्ट सिटी यांच्यात समन्वय असला पाहिजे.