शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

स्मार्ट सिटीचे सीईओ बाबासाहेब मनोहरे विभागीय चौकशीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओपदी पदोन्नतीने नियुक्ती केलेले अधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी उस्मानाबादेत नगर परिषदेच्या मुख्य ...

औरंगाबाद : राज्य शासनाने औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओपदी पदोन्नतीने नियुक्ती केलेले अधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी उस्मानाबादेत नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करीत असताना मोठी अनियमितता केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे.

राज्य सरकारने एएससीडीसीएलच्या सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्‍ती केल्यानंतर महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांची नियुक्‍ती चुकीची असल्याचे म्हणत ती रद्द करण्याची मागणी केली होती. तूर्तास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही नियुक्‍ती थांबवली आहे. यानंतरही मनोहरे यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आपण रुजू झाल्याबद्दलचे पत्र महापालिका आयुक्तांच्या नावे दिले आहे.

एकीकडे त्यांच्या नियुक्तीमुळे वादळ उठलेले असताना मनोहरे उस्मानाबाद नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर असताना त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या कामात अनियमितता केल्याचे आरोप निश्‍चित झाले आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांना २९ जानेवारी रोजी दिला असून, त्यानुसार त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आज रुजू होण्याची शक्यता

मनोहरे यांनी पत्रात म्हटले की, शासनाने माझी मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद या पदावर नियुक्ती केली आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारी रोजी मी या पदावर रुजू होत आहे. या पत्राची प्रत मनोहरे यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनाही दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात मनोहरे कामावर रुजूच झाले नाही. रुजू न होताच त्यांनी परस्पर पत्र काढल्याचे समोर आले आहे.

राजकीय विरोध

बाबासाहेब मनोहरे यांना एएससीडीसीएलच्या सीईओपदी रुजू होऊ न देण्यासाठी शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तर मनोहरे यांना स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बसू देणार नाही, असा इशाराच दिला आहे.