शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कडाक्याच्या थंडीत कार्यालयाबाहेर झोपले; आदिवासी विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

By बापू सोळुंके | Updated: January 4, 2025 17:51 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय येथे धरणे धरली आहेत.

छत्रपती संभाजीनगर: शासकीय आदिवासी विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी कालपासून आंदोलन छेडले आहे. गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला गेला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्र्यांशी बोलणे करुन दिल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही.

शासकीय आदिवासी मुला,मुलींच्या वसतिगृहातील डी.बी.टी. रक्कमेत वाढ करण्यात यावी किंवा पूर्वीप्रमाणे वसतिगृहात भोजन व्यवस्था करण्यात यावी, पंडित दिनदयाल योजनेची डी.बी.टी. रक्कमेत वाढ करावी, शासकीय आदिवासी मुला, मुलींच्या वसतिगृह प्रवेश क्षमता वाढविण्यात यावी,  पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्ती मागील दोन ते तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. ही शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, तसेच यापुढे शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी, आदी मागण्यांसाठी शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह आणि विविध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुला,मुलींनी विविध मागण्यासाठी आंदोलन छेडले आहे. 

शेकडो विद्यार्थ्यांनी गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय येथे धरणे धरली आहेत. कडाक्याची थंडी असूनही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे न घेताच रात्री मुक्कामही या कार्यालयाबाहेर केला. आज सकाळपासून विद्यार्थी, विद्यार्थिनी जोरदार घोषणा देत होत्या. हमे शिक्षण लेने दो, देश को आगे बढने दो, आमच्या मागण्या पूर्ण करा, शिष्यवृत्तीत वाढ झालीच पाहिजे, अशा घोषणा ते देत होते. या आंदोलनात अॅड. सुभाष गावीत,  गणेश वसावे, सुनील वळवी, गुलाब वळवी, विलास पाडवी, अरुण पावरा, अरुण तडवी, दीपक वसावे आणि महेश पावरा आदींसह शेकडो मुला,मुलींनी सहभाग नोंदविला. 

मंत्र्यांशी फोनवर बोलणे करुन दिले तरी आंदोलन सुरूचआदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी आंदोलकांना फोनवरुन दिले. मात्र आदिवासी विकास आयुक्त अथवा प्रकल्प संचालकांनी येथे येऊन आम्हाला आश्वासन द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरagitationआंदोलन