शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

आरोग्य विभाग झोपलेले

By admin | Updated: August 26, 2014 00:39 IST

तामसा : तामसा व परिसरात नागरिकांना विषमज्वराच्या तापाने चांगलेच घेरले़ या आजाराबद्दल आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे़ कारण तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात

तामसा : तामसा व परिसरात नागरिकांना विषमज्वराच्या तापाने चांगलेच घेरले़ या आजाराबद्दल आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे़ कारण तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे़ तर वायफना प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांचे बेहाल होत आहेत़तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ४० ते ४५ हजार लोकसंख्या असून वायफना आरोग्य केंद्रातही तेवढीच लोकसंख्या आहे़ या रुग्णांच्या दिमतीला सध्या तरी एकच वैद्यकीय अधिकारी आहे़ नुकतीच एका वैद्यकीय अधिकाऱ्याची ३१ जुलै रोजी सेवानिवृत्ती झाली़ त्यानंतर आरोग्य प्रशासनाने या ठिकाणी नव्याने नियुक्ती केली नसल्याचे दिसून येत आहे़ तसेच वायफना आरोग्य केंद्रातील सुद्धा तीच परिस्थिती असून येथील वैद्यकीय अधिकारी मुनेश्वर येथील चंद्रपूर येथे बदली झाली आहे़ तर पूर्वीचे वैद्यकीय अधिकारी राम मुसांडे सध्या कार्यरत आहेत़ तर वायफना आरोग्य केंद्रात एका महिला डॉक्टरची नियुक्ती झाली़ पण त्या अद्याप हजर झाल्या नसल्याचे समजले़ तामसा व वायफना आरोग्य केंद्रात प्रत्येकी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याऐवजी त्यांना बैठका, मिटींग असेच कामे सुधरत नसल्याने त्यांना नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही़नागरिकांचे आरोग्य सांभाळायचे असेल तर आरोग्य विभागाने तामसा व वायफनायेथे एक आरोग्य अधिकारी व एक महिला आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरज आहे़ तसेच या दोन्ही केंद्रास औषधीसाठाही देण्याची मागणी होत आहे़ वायफना आक़ेंद्रात तामसा प्रा़आ़ केंद्राच्या जवळ असणारी काही गावे जोडण्यात आल्याने नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही़ त्यामुळे किंवा डॉक्टर वेळेवरउ उपलब्ध होत नाही़ रात्री-बेरात्री एखादा गंभीर आजाराने त्रस्त रुग्णास वायफना आरोग्य केंद्रास जोडलेल्या वडगाव बु़, नाव्हा, रावणगाव, दिग्रस, लोहा, पिंपराळा, एकराळा येथील नागरिकांना गैरसोयीचे होत आहे़(वार्ताहर)तामसा व परिसरात विषमज्वराच्या तापाने नागरिक फणफणत असून सराकरी दवाखान्यात औषधी व एखादवेळी डॉक्टर मिटींगला गेले तर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागतो़ त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ अगोदरच दुष्काळाच्या संकटात सापडलेली जनता विषमज्वर, खोकला, सर्दी, पडसे अशा आजाराने त्रस्त असली तरी आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे़ मच्छरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून आरोग्य विभागाकडून फवारणी करण्याची गरज आहे़