शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग झोपलेले

By admin | Updated: August 26, 2014 00:39 IST

तामसा : तामसा व परिसरात नागरिकांना विषमज्वराच्या तापाने चांगलेच घेरले़ या आजाराबद्दल आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे़ कारण तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात

तामसा : तामसा व परिसरात नागरिकांना विषमज्वराच्या तापाने चांगलेच घेरले़ या आजाराबद्दल आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे़ कारण तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे़ तर वायफना प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांचे बेहाल होत आहेत़तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ४० ते ४५ हजार लोकसंख्या असून वायफना आरोग्य केंद्रातही तेवढीच लोकसंख्या आहे़ या रुग्णांच्या दिमतीला सध्या तरी एकच वैद्यकीय अधिकारी आहे़ नुकतीच एका वैद्यकीय अधिकाऱ्याची ३१ जुलै रोजी सेवानिवृत्ती झाली़ त्यानंतर आरोग्य प्रशासनाने या ठिकाणी नव्याने नियुक्ती केली नसल्याचे दिसून येत आहे़ तसेच वायफना आरोग्य केंद्रातील सुद्धा तीच परिस्थिती असून येथील वैद्यकीय अधिकारी मुनेश्वर येथील चंद्रपूर येथे बदली झाली आहे़ तर पूर्वीचे वैद्यकीय अधिकारी राम मुसांडे सध्या कार्यरत आहेत़ तर वायफना आरोग्य केंद्रात एका महिला डॉक्टरची नियुक्ती झाली़ पण त्या अद्याप हजर झाल्या नसल्याचे समजले़ तामसा व वायफना आरोग्य केंद्रात प्रत्येकी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याऐवजी त्यांना बैठका, मिटींग असेच कामे सुधरत नसल्याने त्यांना नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही़नागरिकांचे आरोग्य सांभाळायचे असेल तर आरोग्य विभागाने तामसा व वायफनायेथे एक आरोग्य अधिकारी व एक महिला आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरज आहे़ तसेच या दोन्ही केंद्रास औषधीसाठाही देण्याची मागणी होत आहे़ वायफना आक़ेंद्रात तामसा प्रा़आ़ केंद्राच्या जवळ असणारी काही गावे जोडण्यात आल्याने नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही़ त्यामुळे किंवा डॉक्टर वेळेवरउ उपलब्ध होत नाही़ रात्री-बेरात्री एखादा गंभीर आजाराने त्रस्त रुग्णास वायफना आरोग्य केंद्रास जोडलेल्या वडगाव बु़, नाव्हा, रावणगाव, दिग्रस, लोहा, पिंपराळा, एकराळा येथील नागरिकांना गैरसोयीचे होत आहे़(वार्ताहर)तामसा व परिसरात विषमज्वराच्या तापाने नागरिक फणफणत असून सराकरी दवाखान्यात औषधी व एखादवेळी डॉक्टर मिटींगला गेले तर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागतो़ त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ अगोदरच दुष्काळाच्या संकटात सापडलेली जनता विषमज्वर, खोकला, सर्दी, पडसे अशा आजाराने त्रस्त असली तरी आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे़ मच्छरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून आरोग्य विभागाकडून फवारणी करण्याची गरज आहे़