शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रूंदीकरणात वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:25 IST

राज्य शासनाने सध्या रस्ते विकासावर भर दिला आहे. बहुतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात असून रस्ते रूंद केले जात आहेत. हे सिमेंटचे जंगल उभे करण्यासाठी लाखमोलाच्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे. तेवढी झाडे लावली तर ठीक; पण त्याकडेही कंत्राटदार दुर्लक्ष करतात.

ठळक मुद्देसेवाग्राम ते मांडगाव मार्गावरील प्रकार : वर्धा ते देवळी रस्त्यासह शहरातही वृक्षतोड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने सध्या रस्ते विकासावर भर दिला आहे. बहुतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात असून रस्ते रूंद केले जात आहेत. हे सिमेंटचे जंगल उभे करण्यासाठी लाखमोलाच्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे. तेवढी झाडे लावली तर ठीक; पण त्याकडेही कंत्राटदार दुर्लक्ष करतात. परिणामी, मार्ग भकास होत आहेत. याकडे लक्ष देत कंत्राटदारांकडून तोडलेल्या झाडांच्या दुप्पट-तिप्पट झाडे लावून घेणे गरजेचे झाले आहे.जिल्ह्यात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्धा शहरात बॅचलर रोड, बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सेवाग्राम ते मांडगाव व वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. हे करीत असताना रस्त्याच्या कडेला कित्येक वर्षांपासून असलेले वृक्ष सर्रास कापली जात आहेत. यामुळे हे मार्ग भकास होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता मागील काही वर्षांपासून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे; पण त्याची फलश्रूती होत नसल्याचेच दिसून येत आहे. एकीकडे वृक्ष लागवड करायची आणि तीच झाडे विकासाच्या नावावर सर्रास कापायची, असा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. सेवाग्राम ते मांडगाव मार्गावर शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. आता रस्त्याच्या दुतर्फा किती वृक्ष लावले जातील की त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, हे वेळच सांगणार आहे. असे असले तरी वृक्षतोडीमुळे सध्यातरी रस्ते भकास झाले असून पर्यावरणाची हानी झाली आहे.वृक्षतोडीतूनही कंत्राटदार करतात कमाईरस्ते विकासाची कामे सुरू असताना शेकडो झाडे कापली जातात. वास्तविक, सदर वृक्ष शासनाची मालमत्ता असते; पण बहुतांश ठिकाणी कंत्राटदारच यातून कमाई करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. रस्ता रूंदीकरणाचे काम घेतलेले कंत्राटदार रस्त्याच्या बाजूची झाडे कापण्याकरिता अन्य कंत्राटदाराला कंत्राट देतात. यात शासनाला महसूल बुडविला जात असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.शिवाय लाकूड चोरही यात हात साफ करीत असल्याचे दिसून येत आहे. सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास वृक्षतोड केली जात आहे. देवळी मार्गावरही वृक्षतोड करण्यात आली आहे. शहरातील रस्ता रूंदीकरणासाठीही लाखमोलाची झाडे कापली गेली. यामुळे सर्वत्र सिमेंटचे जंगल निर्माण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता प्रत्येक मार्गावर वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.