शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुटले; सीईटीत अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : राज्यभरातील महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला सुट मिळाली; मात्र सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू ...

औरंगाबाद : राज्यभरातील महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला सुट मिळाली; मात्र सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश करून घेत आहेत, तर शहरातील महाविद्यालयांची स्थिती ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून सुटून सीईटीत अडकल्यासारखी झाली आहे.

स. भु. कला, वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड म्हणाले, ‘‘पालक विद्यार्थी प्रवेशाचा आग्रह धरत आहेत. सीईटीमुळे प्रवेश देता येत नाहीत. शहरात येऊन शिकू इच्छिणारे विद्यार्थी सीईटीमुळे गावात किंवा जवळच्या ग्रामीण भागात प्रवेश घेत आहेत, तर शहरातील विद्यार्थीही सीईटी देण्यापेक्षा शहरालगतच्या ग्रामीण महाविद्यालयाला पसंती देत आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुटले आणि सीईटीत अडकले, अशी स्थिती महाविद्यालयांची झाली आहे. ’’

देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य रजनिकांत गरुड म्हणाले, ‘‘प्रवेशासाठी विचारपूस करायला विद्यार्थी येत आहेत. ग्रामीणसह काही महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया होत आहे. सध्या दहावीचे गुणपत्र व प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. अगोदर सीईटी देणारे व नंतर सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे सीईटी देण्यास इच्छुक नसलेले विद्यार्थी सरळ ग्रामीणमध्ये, क्लासेसशी सलग्न महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करत आहेत. प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेतली नसती, तर आठ दिवसांतच प्रवेश प्रक्रिया आटोपली असती व आता प्रत्यक्ष वर्गही सुरू झाले असते.’’