शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुटले; सीईटीत अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : राज्यभरातील महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला सुट मिळाली; मात्र सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू ...

औरंगाबाद : राज्यभरातील महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला सुट मिळाली; मात्र सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश करून घेत आहेत, तर शहरातील महाविद्यालयांची स्थिती ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून सुटून सीईटीत अडकल्यासारखी झाली आहे.

स. भु. कला, वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड म्हणाले, ‘‘पालक विद्यार्थी प्रवेशाचा आग्रह धरत आहेत. सीईटीमुळे प्रवेश देता येत नाहीत. शहरात येऊन शिकू इच्छिणारे विद्यार्थी सीईटीमुळे गावात किंवा जवळच्या ग्रामीण भागात प्रवेश घेत आहेत, तर शहरातील विद्यार्थीही सीईटी देण्यापेक्षा शहरालगतच्या ग्रामीण महाविद्यालयाला पसंती देत आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुटले आणि सीईटीत अडकले, अशी स्थिती महाविद्यालयांची झाली आहे. ’’

देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य रजनिकांत गरुड म्हणाले, ‘‘प्रवेशासाठी विचारपूस करायला विद्यार्थी येत आहेत. ग्रामीणसह काही महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया होत आहे. सध्या दहावीचे गुणपत्र व प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. अगोदर सीईटी देणारे व नंतर सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे सीईटी देण्यास इच्छुक नसलेले विद्यार्थी सरळ ग्रामीणमध्ये, क्लासेसशी सलग्न महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करत आहेत. प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेतली नसती, तर आठ दिवसांतच प्रवेश प्रक्रिया आटोपली असती व आता प्रत्यक्ष वर्गही सुरू झाले असते.’’