शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुटले; सीईटीत अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : राज्यभरातील महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला सुट मिळाली; मात्र सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू ...

औरंगाबाद : राज्यभरातील महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला सुट मिळाली; मात्र सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश करून घेत आहेत, तर शहरातील महाविद्यालयांची स्थिती ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून सुटून सीईटीत अडकल्यासारखी झाली आहे.

स. भु. कला, वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड म्हणाले, ‘‘पालक विद्यार्थी प्रवेशाचा आग्रह धरत आहेत. सीईटीमुळे प्रवेश देता येत नाहीत. शहरात येऊन शिकू इच्छिणारे विद्यार्थी सीईटीमुळे गावात किंवा जवळच्या ग्रामीण भागात प्रवेश घेत आहेत, तर शहरातील विद्यार्थीही सीईटी देण्यापेक्षा शहरालगतच्या ग्रामीण महाविद्यालयाला पसंती देत आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुटले आणि सीईटीत अडकले, अशी स्थिती महाविद्यालयांची झाली आहे. ’’

देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य रजनिकांत गरुड म्हणाले, ‘‘प्रवेशासाठी विचारपूस करायला विद्यार्थी येत आहेत. ग्रामीणसह काही महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया होत आहे. सध्या दहावीचे गुणपत्र व प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. अगोदर सीईटी देणारे व नंतर सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे सीईटी देण्यास इच्छुक नसलेले विद्यार्थी सरळ ग्रामीणमध्ये, क्लासेसशी सलग्न महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करत आहेत. प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेतली नसती, तर आठ दिवसांतच प्रवेश प्रक्रिया आटोपली असती व आता प्रत्यक्ष वर्गही सुरू झाले असते.’’