शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

सिव सैलम शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:01 IST

औरंगाबाद जिल्ह्यात डिजिटल इंडियाच्या कामाला आणखी गती देण्यासाठी खुद्द टेलिकम्युनिकेशन विभागाचे अतिरिक्त सचिव सिव सैलम शहरात दाखल झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘डिजिटल इंडिया’ हा केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम. याद्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीला उच्चगतीची ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात डिजिटल इंडियाच्या कामाला आणखी गती देण्यासाठी खुद्द टेलिकम्युनिकेशन विभागाचे अतिरिक्त सचिव सिव सैलम शहरात दाखल झाले आहेत. आज बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयात बसून दिवसभर बैठका घेतल्या. या योजनेचे काम कसे चालले आहे, याची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी उद्या, शनिवारी ते ग्रामीण भागाचा दौराही करणार आहेत.केंद्र सरकारच्या नॅशनल आॅप्टिक फायबर नेटवर्कच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींची जोडणी करण्यात येणार आहे. बीएसएनएलने आजपर्यंत यातील १८१ ग्रामपंचायतींना अतिशय उच्चगतीची ब्रॉडबँड सेवा पुरविली आहे. याद्वारे सुमारे ८०० कि.मी.पेक्षा जास्त आॅप्टिकल फायबर केबल्स टाकल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत उर्वरित १८२ ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात संचार क्रांती घडून येणार आहे. याशिवाय मोबाइल नेटवर्कचे अद्ययावतीकरण अंतर्गत जिल्ह्यात १५८ नवीन थ्री जी व आणि ४५ नवीन टू जी टॉवर उभारण्यात येत आहे. मोबाइल नेटवर्कच्या विस्तारानंतर कव्हरेज समस्येचे निराकरण होईल व डेटा स्पीड मोठ्या प्रमाणात वाढेल.