शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड विभागातील रेल्वेचे एकेरी मार्ग विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 11:53 IST

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

ठळक मुद्देनांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनेनंतर रेल्वेची वाहतूक ठप्प होते.इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी २० डिसेंबर २०१७ रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनची पाहणी केली. यावेळी नांदेड विभागातील रेल्वेमार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरुपी आळा बसेल, असे ते म्हणाले. यानंतर विद्युतीकरणाच्या कामासाठी १२ जानेवारीपासून नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यात रेल्वे पूल, लेव्हल क्रॉसिंग (भुयारी मार्ग), वळण, सिग्नल, पॉइंट अ‍ॅण्ड क्रॉसिंग आदींविषयी माहिती गोळा करण्यात आली. 

नांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनेनंतर रेल्वेची वाहतूक ठप्प होते. इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे तासन्तास रेल्वे वाहतूक खोळंबते. शनिवारी याच अनुभवाला प्रवाशांना पुन्हा एकदा सामोरे जावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची मागणी आहे. एप्रिलपासून एके री मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू होईल, असे सांगण्यात आले. परंतु त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. याविषयी ‘दमरे’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 

नादुरुस्तीच्या घटनाएप्रिल ते सप्टेंबर २०१७ कालावधीत दक्षिण मध्य रेल्वेच्या संपूर्ण झोनमध्ये ६० डिझेल इंजिन नादुरुस्तीच्या घटना घडल्या. दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन २८ आॅक्टोबर २०१७ रोजी आसनगाव-आटगावदरम्यान नादुरुस्त झाले. तर नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसचे इंजिन १४ एप्रिल रोजी बदनापूर-जालनादरम्यान नादुरुस्त झाले आणि रेल्वेची वाहतूक दोन तास ठप्प झाली.

पर्यटन सचिवांना सीएमआयएचे निवेदन चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए) या उद्योजकांच्या मराठवाड्यातील अ‍ॅपेक्स बॉडीने केंद्रीय पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांना पर्यटनाच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. आयकॉनिक पर्यटन स्थळे म्हणून ओळख असलेल्या अजिंठा, वेरूळ लेण्यांच्या विकासासाठी विशेष बैठकीचे आयोजन वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले, अशी माहिती सीएमआयएचे माजी अध्यक्ष आशिष गर्दे यांनी कळविली. 

यावेळी राज्य पर्यटन खात्याचे सचिव विजयकुमार गौतम, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची उपस्थिती होती. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमाने जात नाहीत. दिल्ली-आग्रा-जयपूर-उदयपूर आणि इतर महत्त्वपूर्ण पर्यटन मंडळाशी औरंगाबादला जोडले जावे. अजिंठा, वेरूळ, देवगिरी किल्ला,बीबीका मकबरा येथे लाईट व म्युझिक शो सुरू करावा. अजिंठा लेणी परिसरात रोप-वे सुरू करावा. या इतर अनेक मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीGovernmentसरकारNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद