शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

५० टक्क्यांनी वाढले रेशीमक्षेत्र

By admin | Updated: June 22, 2017 23:24 IST

हिंगोली : जिल्ह्यातील बरेच शेतकरी पारंपरिक पिकाला बगल देत रेशीम शेतीकडे वळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील बरेच शेतकरी पारंपरिक पिकाला बगल देत रेशीम शेतीकडे वळले आहेत. जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाकडून ३०१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. त्यापैकी २२४ शेतकऱ्यांच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. यंदा रेशीम शेतीत ५० टक्क्याने वाढ झाली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पारंपारीक पिकाचे नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. पाचही तालुक्यातील ३०१ शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी जिल्हा कार्यालयात नोंद केली आहे. यात औंढा, वसमत तालुक्यातील जांब येथे २५, शिंदगी ३०, पांगरा शिंदे ३८, गुंज २५ आणि डिग्रस बु. येथे २५ , तर सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातील धानोरा ३३, वडहिवरा ४२, भोगाव २६, सवड ११ आणि कडती २६ अशा एकूण ३०१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. निवडलेल्यांपैकी २२४ शेतकऱ्यांच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली. तर प्रस्तावांना कळमनुरी तहसीलदारांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हिंगोली, वसमत, सेनगाव येथील १४९ शेतकऱ्यांची माहितीव प्रस्ताव संबंधित तहसीलदारांकडे पाठवूनही मंजुरी दिली नसल्याने पुढील कारवाई थांबली आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजून तरी तुती लावगडीस सुरुवात झालेली नाही. मात्र जुलै महिन्यात तुती लावगडीस गती येणार आहे. त्यापूर्वी या प्रस्तावांना मंजुरी देणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास तुतीचे क्षेत्र दुप्पट होण्यास मदत होणार आहे. मनरेगा योजनेत लागवडीचे काम करावे लागत असल्याने त्यास तहसीलदारांची मंजुरी आवश्यक आहे.जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात ६ पदे मंजूर असले तरी केवळ दोघांवरच जिल्ह्याची मदार आहे. यात एक व्यवस्थापक आहेत. तर दुसरा कर्मचारी. दिवसेंदिवस शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत असल्याने या कार्यालयात माहिती विचारण्यास येत आहेत. मात्र शेतकऱ्यांना माहिती देणेही कठीण होत आहे.