शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

संघर्ष पेटण्याची चिन्हं! विजयादशमीनंतर गोदावरीत वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन

By विकास राऊत | Updated: October 19, 2023 16:30 IST

जायकवाडीत ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : विजयादशमीनंतर नाशिक-अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमूहांतून जायकवाडीसाठी ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होणे शक्य आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात प्राथमिक बैठक झाली.

बैठकीला मुख्य अभियंता विजय घोगरे, सबीनवार, नाशिक, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे अभियंते उपस्थित होते. यंदा मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट आहे. या विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सध्या ४७.०६ टक्के जलसाठा आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत ४७.२३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा तो ५३ टक्के कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर परिणाम होईल, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई होणे शक्य आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार......२००५ मध्ये शासनाने समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर केला. त्यानुसार मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी स्वीकारल्या. त्यात जायकवाडीत दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमत: करण्यात यावा. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरणांतून जायकवाडी धरणामध्ये ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारे पाणी सोडावे, असे ठरले होते. त्यानुसार जायकवाडीत दरवर्षीच्या १५ ऑक्टोबर रोजी उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडले जाते.

पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हेयंदा कमी पाऊस पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. परभणीतील किसान सभेने वरच्या धरणातून २० टीएमसी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महामंडळ प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. तर नगर जिल्ह्यातील काही शेतकरी आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. एकूणच पाणी सोडण्यावरून नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

दृष्टिक्षेपात जायकवाडीची सद्यस्थिती....एकूण क्षमता : १०२ टीएमसीउपयुक्त पाणीसाठा : ७६ टीएमसी१६ ऑक्टोबरचा पाणीसाठा.......उपयुक्त ३६ टीएमसी म्हणजे ४७.०५ टक्केसमन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार ६५ टक्के उपयुक्त साठा धरणात पाहिजे.त्यानुसार कमी पडणारा उपयुक्त पाणीसाठा १३.७६ टीएमसीधरणातील आजपर्यंत झालेला एकूण पाणी वापर : ७ टीएमसीधरणात आलेले पाणी : २४ टीएमसीअहमदनगर व नाशिकमधून लागणारे अंदाजे पाणी : ११ ते १३ टीएमसी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीgodavariगोदावरी