शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

संघर्ष पेटण्याची चिन्हं! विजयादशमीनंतर गोदावरीत वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन

By विकास राऊत | Updated: October 19, 2023 16:30 IST

जायकवाडीत ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : विजयादशमीनंतर नाशिक-अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमूहांतून जायकवाडीसाठी ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होणे शक्य आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात प्राथमिक बैठक झाली.

बैठकीला मुख्य अभियंता विजय घोगरे, सबीनवार, नाशिक, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे अभियंते उपस्थित होते. यंदा मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट आहे. या विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सध्या ४७.०६ टक्के जलसाठा आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत ४७.२३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा तो ५३ टक्के कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर परिणाम होईल, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई होणे शक्य आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार......२००५ मध्ये शासनाने समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर केला. त्यानुसार मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी स्वीकारल्या. त्यात जायकवाडीत दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमत: करण्यात यावा. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरणांतून जायकवाडी धरणामध्ये ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारे पाणी सोडावे, असे ठरले होते. त्यानुसार जायकवाडीत दरवर्षीच्या १५ ऑक्टोबर रोजी उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडले जाते.

पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हेयंदा कमी पाऊस पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. परभणीतील किसान सभेने वरच्या धरणातून २० टीएमसी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महामंडळ प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. तर नगर जिल्ह्यातील काही शेतकरी आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. एकूणच पाणी सोडण्यावरून नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

दृष्टिक्षेपात जायकवाडीची सद्यस्थिती....एकूण क्षमता : १०२ टीएमसीउपयुक्त पाणीसाठा : ७६ टीएमसी१६ ऑक्टोबरचा पाणीसाठा.......उपयुक्त ३६ टीएमसी म्हणजे ४७.०५ टक्केसमन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार ६५ टक्के उपयुक्त साठा धरणात पाहिजे.त्यानुसार कमी पडणारा उपयुक्त पाणीसाठा १३.७६ टीएमसीधरणातील आजपर्यंत झालेला एकूण पाणी वापर : ७ टीएमसीधरणात आलेले पाणी : २४ टीएमसीअहमदनगर व नाशिकमधून लागणारे अंदाजे पाणी : ११ ते १३ टीएमसी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीgodavariगोदावरी