शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संघर्ष पेटण्याची चिन्हं! विजयादशमीनंतर गोदावरीत वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन

By विकास राऊत | Updated: October 19, 2023 16:30 IST

जायकवाडीत ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : विजयादशमीनंतर नाशिक-अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमूहांतून जायकवाडीसाठी ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होणे शक्य आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात प्राथमिक बैठक झाली.

बैठकीला मुख्य अभियंता विजय घोगरे, सबीनवार, नाशिक, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे अभियंते उपस्थित होते. यंदा मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट आहे. या विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सध्या ४७.०६ टक्के जलसाठा आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत ४७.२३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा तो ५३ टक्के कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर परिणाम होईल, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई होणे शक्य आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार......२००५ मध्ये शासनाने समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर केला. त्यानुसार मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी स्वीकारल्या. त्यात जायकवाडीत दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमत: करण्यात यावा. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरणांतून जायकवाडी धरणामध्ये ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारे पाणी सोडावे, असे ठरले होते. त्यानुसार जायकवाडीत दरवर्षीच्या १५ ऑक्टोबर रोजी उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडले जाते.

पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हेयंदा कमी पाऊस पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. परभणीतील किसान सभेने वरच्या धरणातून २० टीएमसी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महामंडळ प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. तर नगर जिल्ह्यातील काही शेतकरी आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. एकूणच पाणी सोडण्यावरून नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

दृष्टिक्षेपात जायकवाडीची सद्यस्थिती....एकूण क्षमता : १०२ टीएमसीउपयुक्त पाणीसाठा : ७६ टीएमसी१६ ऑक्टोबरचा पाणीसाठा.......उपयुक्त ३६ टीएमसी म्हणजे ४७.०५ टक्केसमन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार ६५ टक्के उपयुक्त साठा धरणात पाहिजे.त्यानुसार कमी पडणारा उपयुक्त पाणीसाठा १३.७६ टीएमसीधरणातील आजपर्यंत झालेला एकूण पाणी वापर : ७ टीएमसीधरणात आलेले पाणी : २४ टीएमसीअहमदनगर व नाशिकमधून लागणारे अंदाजे पाणी : ११ ते १३ टीएमसी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीgodavariगोदावरी