शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

शैक्षणिक शुल्क माफीसाठी आता स्वाक्षरी मोहीम

By admin | Updated: November 29, 2015 23:16 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी तर खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम गेले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी तर खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम गेले आहेत. त्यामुळे शेतकरी प्रंचड आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडले आहे. असे असतानाही शासनाकडून केवळ परीक्षा शुल्क माफ केले जात आहे. वास्तविक परीक्षा शुल्क नाममात्र असते. त्यामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शुल्क माफ करावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला आहे. सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्याचे अर्थकारण शेतीवर आधारीत आहे. त्यामुळे जवळपास ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुले शिक्षण शुल्क भरण्यासाठी असमर्थ असल्या कारणाने शिक्षण बंद करु लागली आहेत. मध्यंतरी शासनाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केल्याची घोषणा केली. परंतु ही केवळ घोषणाच राहिल्याने कळंब तालुक्यातील काही महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरण्यासाठी लागणारी नाममात्र रक्कम नसल्याने परीक्षेपासून वंचित रहावे लागले. वास्तविक पाहता परीक्षा शुल्क हे अतिशय नाममात्र असते. मात्र शिक्षण शुल्क हे कित्येक पटीने अधिक असते. जे विद्यार्थी परीक्षा शुल्क भरु शकत नाहीत त्यांना शिक्षण शुल्क भरणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांच्या सह्या घेवून हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. राणाजगजितसिंह पाटील हे देणार आहेत. याउपरही शासनाने परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)