शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या टप्प्यात अवतरली ‘श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 20:00 IST

वर्षभरात १२ गावांचा कायापालट करण्याचे आव्हान

ठळक मुद्दे ही योजनाच दीड-दोन वर्षे अडगळीला पडली होती.केंद्र सरकारकडून ९ कोटी रुपये प्राप्त

- विजय सरवदे 

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजने’च्या अंमलबजावणीसाठी शासन, प्रशासनाला आता शेवटच्या टप्प्यात जाग आली आहे. औरंगाबाद शहरापासून जवळ असलेले आणि जास्त लोकसंख्या असलेला गावसमूह म्हणून जोगेश्वरीची निवड करण्यात आली. जोगेश्वरी क्लस्टरअंतर्गत लगतच्या ५ ग्रामपंचायती आणि त्याअंतर्गत ७ गावे अशा एकूण १२ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

शहराप्रमाणे गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून तेथे सर्वांगीण विकास करण्यासाठी सन २०१७-१८ मध्ये ही योजना अमलात आली. सन २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांत सदरील गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या योजनांच्या माध्यमातून नागरी सुविधांची ७० टक्के कामे केली जाणार असून, ३० टक्के कामांसाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. तथापि, सन २०१७-१८ मध्ये अस्तित्वात असलेली ही योजनाच दीड-दोन वर्षे अडगळीला पडली होती. या योजनेची आठवण ना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला होती, ना शासनाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती, तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती कार्यरत कराव्या लागतात. 

दुसरीकडे, या योजनेसाठी निवड झालेल्या गावांच्या गरजा लक्षात घेऊन समावेशक आराखडा तयार करावा लागतो. तो आराखडा सिडको प्रशासनाने केला आहे. जिल्हा विकास यंत्रणेच्या माध्यमातून या गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर नियोजन आराखडा नुकताच राज्य शासनाला सादर केला असून, तो मंजूरही झाला आहे. शासनाकडून त्या आराखड्यास केंद्र सरकारची मान्यता घेतली जाणार आहे. तीन वर्षांत या गावांमध्ये रस्ते, भूमिगत गटार, शौचालये, उद्याने, आरोग्याच्या सुविधा आदी कामे केली जातील. अलीकडे या योजनेतील कामे सुरू झाली असून, वाळूजमध्ये उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उपकरणे व रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव सादर केला आहे. आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या विविध योजनांतर्गत २२ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.

केंद्र सरकारकडून ९ कोटी रुपये प्राप्तयासंदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी सांगितले की, या योजनेसाठी वाळूज, जोगेश्वरी, घाणेगाव, कासोदा आणि एकलहेरा या ५ ग्रामपंचायती आणि त्याअंतर्गत ७ गावे अशा एकूण १२ गावांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून तीन वर्षांत ३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी सध्या ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी खर्च झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच केंद्र सरकारकडून निधीचा पुढील हप्ता मिळणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी