शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अखेरच्या टप्प्यात अवतरली ‘श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 20:00 IST

वर्षभरात १२ गावांचा कायापालट करण्याचे आव्हान

ठळक मुद्दे ही योजनाच दीड-दोन वर्षे अडगळीला पडली होती.केंद्र सरकारकडून ९ कोटी रुपये प्राप्त

- विजय सरवदे 

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजने’च्या अंमलबजावणीसाठी शासन, प्रशासनाला आता शेवटच्या टप्प्यात जाग आली आहे. औरंगाबाद शहरापासून जवळ असलेले आणि जास्त लोकसंख्या असलेला गावसमूह म्हणून जोगेश्वरीची निवड करण्यात आली. जोगेश्वरी क्लस्टरअंतर्गत लगतच्या ५ ग्रामपंचायती आणि त्याअंतर्गत ७ गावे अशा एकूण १२ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

शहराप्रमाणे गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून तेथे सर्वांगीण विकास करण्यासाठी सन २०१७-१८ मध्ये ही योजना अमलात आली. सन २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांत सदरील गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या योजनांच्या माध्यमातून नागरी सुविधांची ७० टक्के कामे केली जाणार असून, ३० टक्के कामांसाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. तथापि, सन २०१७-१८ मध्ये अस्तित्वात असलेली ही योजनाच दीड-दोन वर्षे अडगळीला पडली होती. या योजनेची आठवण ना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला होती, ना शासनाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती, तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती कार्यरत कराव्या लागतात. 

दुसरीकडे, या योजनेसाठी निवड झालेल्या गावांच्या गरजा लक्षात घेऊन समावेशक आराखडा तयार करावा लागतो. तो आराखडा सिडको प्रशासनाने केला आहे. जिल्हा विकास यंत्रणेच्या माध्यमातून या गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर नियोजन आराखडा नुकताच राज्य शासनाला सादर केला असून, तो मंजूरही झाला आहे. शासनाकडून त्या आराखड्यास केंद्र सरकारची मान्यता घेतली जाणार आहे. तीन वर्षांत या गावांमध्ये रस्ते, भूमिगत गटार, शौचालये, उद्याने, आरोग्याच्या सुविधा आदी कामे केली जातील. अलीकडे या योजनेतील कामे सुरू झाली असून, वाळूजमध्ये उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उपकरणे व रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव सादर केला आहे. आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या विविध योजनांतर्गत २२ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.

केंद्र सरकारकडून ९ कोटी रुपये प्राप्तयासंदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी सांगितले की, या योजनेसाठी वाळूज, जोगेश्वरी, घाणेगाव, कासोदा आणि एकलहेरा या ५ ग्रामपंचायती आणि त्याअंतर्गत ७ गावे अशा एकूण १२ गावांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून तीन वर्षांत ३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी सध्या ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी खर्च झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच केंद्र सरकारकडून निधीचा पुढील हप्ता मिळणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी