शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कोर्टात शुभमंगलम् !

By admin | Updated: October 29, 2015 00:19 IST

उस्मानाबाद : पारंपरिक होणाऱ्या विवाहावर लाखो रूपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणाऱ्या नोंदणी विवाहाचे प्रमाण मागील पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते.

उस्मानाबाद : पारंपरिक होणाऱ्या विवाहावर लाखो रूपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणाऱ्या नोंदणी विवाहाचे प्रमाण मागील पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते. २०१० मध्ये ३५ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. परंतु, २०१५ मध्ये आॅक्टोबरअखेर केवळ १३ जोडपी या पद्धतीने विवाहबद्ध झाली.ना जातीची अडचण ना पैशांची उधळपट्टी, उलट कायदेशीर मान्यता हे, नोंदणी विवाहाचे वैशिष्टे. त्यामुळेच मागील चार-पाच वर्षात सर्वसामान्यांचा कल नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वाढला होता. परंतु, परंतु, २०१३ पासून नोंदणी पद्धतीनेचे विवाहाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. दोन भिन्न जाती किंवा धर्मातील तरूण-तरूणी त्यांच्या घरातून विरोध झाल्यास नोंदणी विवाहाचा पर्याय निवडतात. याशिवाय ज्यांना परदेशी जायचे आहे किंवा तेथे स्थायिक व्हावयचे असेल तर पासपोर्टसाठी नोंदणी विवाहाचे प्रमाणपत्र प्रमुख ‘डाक्युमेंट’ मानले जाते. म्हणून अनेक श्रीमंत कुटुंबातील विवाह नोंदणी पद्धीने केले जातात. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने स्वागत समारंभ केले जातात. जानेवारी ते डिसेंबर २०१० या कालावधीत ३५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने शुभमंगलम् उरकले. त्यानंतर औ२०११ मध्ये ही संख्या काही प्रमाणात कमी झाली. ३२ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. तसेच २०१३ मध्ये ही संख्या एकने वाढली. ३३ जोडपीण नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. २०१३ मध्ये मात्र, हे प्रमाण तब्बल ९ ने कमी झाले. या वर्षात अवघी २४ जोडपी या पद्धतीने विवाह बंधनात बांधली गेली. २०१४ मध्ये हे प्रमाण दोनने वाढले. २६ जोडपी याच पद्धतीने विवाहबद्ध झाली. तर चालू वर्षामध्ये म्हणजेच जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या दहा महिन्यांच्या कालावधीत केवळ १३ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. एकूणच २०१० च्या तुलनेत नोंदणी विवाहांची संख्या तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाली आहे.(प्रतिनिधी)