शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात शुभमंगलम् !

By admin | Updated: October 29, 2015 00:19 IST

उस्मानाबाद : पारंपरिक होणाऱ्या विवाहावर लाखो रूपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणाऱ्या नोंदणी विवाहाचे प्रमाण मागील पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते.

उस्मानाबाद : पारंपरिक होणाऱ्या विवाहावर लाखो रूपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणाऱ्या नोंदणी विवाहाचे प्रमाण मागील पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते. २०१० मध्ये ३५ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. परंतु, २०१५ मध्ये आॅक्टोबरअखेर केवळ १३ जोडपी या पद्धतीने विवाहबद्ध झाली.ना जातीची अडचण ना पैशांची उधळपट्टी, उलट कायदेशीर मान्यता हे, नोंदणी विवाहाचे वैशिष्टे. त्यामुळेच मागील चार-पाच वर्षात सर्वसामान्यांचा कल नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वाढला होता. परंतु, परंतु, २०१३ पासून नोंदणी पद्धतीनेचे विवाहाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. दोन भिन्न जाती किंवा धर्मातील तरूण-तरूणी त्यांच्या घरातून विरोध झाल्यास नोंदणी विवाहाचा पर्याय निवडतात. याशिवाय ज्यांना परदेशी जायचे आहे किंवा तेथे स्थायिक व्हावयचे असेल तर पासपोर्टसाठी नोंदणी विवाहाचे प्रमाणपत्र प्रमुख ‘डाक्युमेंट’ मानले जाते. म्हणून अनेक श्रीमंत कुटुंबातील विवाह नोंदणी पद्धीने केले जातात. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने स्वागत समारंभ केले जातात. जानेवारी ते डिसेंबर २०१० या कालावधीत ३५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने शुभमंगलम् उरकले. त्यानंतर औ२०११ मध्ये ही संख्या काही प्रमाणात कमी झाली. ३२ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. तसेच २०१३ मध्ये ही संख्या एकने वाढली. ३३ जोडपीण नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. २०१३ मध्ये मात्र, हे प्रमाण तब्बल ९ ने कमी झाले. या वर्षात अवघी २४ जोडपी या पद्धतीने विवाह बंधनात बांधली गेली. २०१४ मध्ये हे प्रमाण दोनने वाढले. २६ जोडपी याच पद्धतीने विवाहबद्ध झाली. तर चालू वर्षामध्ये म्हणजेच जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या दहा महिन्यांच्या कालावधीत केवळ १३ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. एकूणच २०१० च्या तुलनेत नोंदणी विवाहांची संख्या तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाली आहे.(प्रतिनिधी)