शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

गरिबांच्या उद्धाराचा विचार व्हावा

By admin | Updated: March 28, 2015 00:46 IST

औरंगाबाद : देशातील दीन, दलित, शोषित, वंचित, गरीब, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

औरंगाबाद : देशातील दीन, दलित, शोषित, वंचित, गरीब, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५५ व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी झालेल्या या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल चे. विद्यासागर राव होते. याप्रसंगी व्यासपीठावरील पहिल्या रांगेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांची उपस्थिती होती. दीक्षांत समारंभानिमित्त राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विद्यापीठात आज पहिल्यांदाच आगमन झाले. सकाळी ११.३० वाजता दीक्षांत मिरवणूक नाट्यगृहात पोहोचली. कार्यक्रमात १० विद्याशाखांच्या १६० पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना कुलपतींच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी दीक्षांत भाषणात नितीन गडकरी यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग देशातील गरिबी, उपासमारी व समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी करावा, असे आवाहन केले. शिक्षणाने माणूस मोठा होतो. देशात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक आहे; पण गरिबी मात्र, या देशाचा पिच्छा सोडत नाही. असे असले तरी कोणताही देश साधनसंपत्तीने श्रीमंत ठरत नसतो, तर तेथे चारित्र्यवान नागरिक किती आहेत, यावरून त्या देशाची श्रीमंती ठरत असते. आता तुम्ही सारे जण नव्या पर्वात प्रवेश करत आहात. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक प्रगतीचा कायापालट करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. संतांची भूमी म्हणून देशाची ओळख आहे. संतांनी कोणत्या विद्यापीठाची पदवी घेतलेली नव्हती; पण त्यांनी जी साहित्य रचना केली. जो विचार त्यांनी दिला. त्यावर आज पीएच.डी. केली जाते. पदवीला कर्तृत्व आणि वर्तणुकीची जोड दिल्याशिवाय जीवनाला परिपूर्णता येत नाही. पदवीचा वापर करताना जीवनाच्या परीक्षेत चांगले उत्तीर्ण व्हा आणि या देशाचे चांगले नागरिक बना. यावेळी गडकरी यांनी राबविलेल्या काही प्रयोगांची माहिती दिली. ते म्हणाले की, कापलेले केस जमा करून विकत घेण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. शिवाय कापलेल्या केसांपासून ‘अ‍ॅमिनो अ‍ॅसिड’ तयार करण्यात आले. त्याचा वापर शेतीसाठी करण्यात आला. ड्रेनेजमधून सोडून दिल्या जाणाऱ्या घाण पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात आले. कोट्यवधी रुपयांचा महसूल यातून मिळाला. टाकाऊपासून उपयुक्त वस्तू बनविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. संशोधनाचा वापर यासाठी करावा.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केले. प्रारंभी डॉ. संजय मोहोड व डॉ. जयंत शेवतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशास्त्र विभाग व स. भु. महाविद्यालयाच्या चमूने राष्ट्रगीत व विद्यापीठगीत सादर केले. डॉ. समाधान इंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, आ. अतुल सावे, माजी आ. श्रीकांत जोशी आदींची उपस्थिती होती.