शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

तुकडीवाढ समित्यांमध्ये सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:42 IST

विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात तुकडीवाढ देण्याच्या संदर्भात समित्या पाठविण्यात येत आहेत. या समित्यांच्या टी.ए.,डी.ए.पोटी हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला.

ठळक मुद्देविद्यापीठ : एकाच महाविद्यालयात चार-चार समित्या; दुष्काळात पैशांची उधळपट्टी

औरंगाबाद : विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात तुकडीवाढ देण्याच्या संदर्भात समित्या पाठविण्यात येत आहेत. या समित्यांच्या टी.ए.,डी.ए.पोटी हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनातर्फे महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० वर्षाच्या विस्तारीकरणांतर्गत होणाऱ्या तुकडी वाढीच्या अनुषंगाने समित्या पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका महाविद्यालयातील विविध शाखांच्या प्रत्येक तुकडीसाठी चार सदस्यांची स्वतंत्र समिती पाठविण्यात येत आहे. या समितीमध्ये प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश असून, या चौघांच्या डी.ए.सह प्रवास भत्त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात येत आहेत. एका महाविद्यालयात एकच समिती गेली पाहिजे. या समित्या पाठविताना सर्व घटकातील प्राध्यापकांचा विचार केला पाहिजे. मात्र, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर हे दबावात काम करत असून, विशिष्ट गटाच्या, जातीच्या प्राध्यापकांनाच समित्यांवर पाठवत असल्याचा आरोपही व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याविषयी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, बामुक्टोचे सचिव डॉ. विक्रम खिलारे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. हंसराज जाधव आदींनी स्वाक्षऱ्या आहेत. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.चौकट,बामुक्टो, बामुक्टा आंदोलन करणारविस्तारीकरणांतर्गत समित्यांमध्ये विशिष्ट महाविद्यालयातील प्राध्यापकांचा भरणा करणे, सेवाज्येष्ठतेचा विचार न करणे अशी बेकायदेशीर प्रक्रिया होत आहे़ या प्रक्रियेतील सावळा गोंधळ आणि दोषींवर कारवाईसाठी बामुक्टो, बामुक्टा आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ