शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता औरंगाबादमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:05 IST

३१ मेपर्यंत जीवनावश्यक वस्तू दुकानास सवलत

ठळक मुद्देमनपा प्रशासकांचे खंडपीठात तोंडी निवेदन लॉकडाऊनचे सर्व नियम लागू राहणार

औरंगाबाद :  जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बुधवारपासून (दि. २७) दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहतील, असे तोंडी निवेदन मनपा प्रशासकांतर्फे मंगळवारी खंडपीठात करण्यात आले. याचिकेचा उद्देश सफल झाल्यामुळे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी, दि. २६ मे रोजी याचिका निकाली काढली.

१५ मेच्या मध्यरात्रीपासून जीवनावश्यक वस्तूंची विक्री व खरेदीवर २० मेपर्यंत पूर्णपणे बंदी घालणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या तोंडी सूचनावजा आदेशाला  आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणी वेळी अ‍ॅड.  संतोष चपळगावकर यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. तसा आदेश मनपा आयुक्त मंगळवारी जारी  करीत  आहेत. वरील ७ तासांपैकी  सकाळी दुकाने  उघडल्यानंतर अर्धा तास आणि दुपारी दुकान बंद करण्या  पूर्वी अर्धा तास, असा एकूण एक तास दुकानाची साफसफाई  आणि सामानाची व्यवस्था  लावता  येईल. नागरिक आणि दुकानदारांना सोयीच्या वेळेत सूट देण्याची अपेक्षा  खंडपीठाने  शुक्रवारी (दि.२३) व्यक्त केली होती.

सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सूट का देत नाही?  ज्यामुळे  नागरिकांना  जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी  पुरेसा  वेळ मिळेल आणि गर्दी होणार नाही, अशी विचारणा खंडपीठाने केली होती, तसेच वेळ वाढवून देण्याची विनंती याचिकाकर्त्यानेही केली होती. त्यावरून मनपा प्रशासकांनी मंगळवारी वरीलप्रमाणे निवेदन केले. लोकांच्या  आणि दुकानदारांच्या  सोयीसाठी न्यायमूर्तीद्वय  काही  मार्गदर्शक सूचना  करणार आहेत. त्यासह  सविस्तर आदेश बुधवारी (दि. २७) दिला जाईल,  असे खंडपीठाने सूचित केले.

लॉकडाऊनचे सर्व नियम लागू राहणारमहापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दुपारी अध्यादेश काढून किराणा दुकान आणि भाजीपाला खरेदी- विक्रीला दुपारी २ वाजेपर्यंत मुभा दिली. ३१ मेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. आदेशात म्हटले आहे की, सकाळी ७ ते ७.३० आणि दुपारी १.३० ते २ हा वेळ दुकाने, हातगाड्या उघडणे व बंद करण्यासाठी राखीव आहे. सुरक्षित अंतर राखणे,  नियमित मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.  यावेळी गर्दी होणार नाही, परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद