शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

धक्कादायक ! नागरिकत्व मिळण्यापूर्वीच परदेशी नागरिकांना पॅन, आधार कार्ड सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:21 IST

माहिती अधिकारात समोर आली माहिती 

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यातमनपाने दिले विवाह नोंदणी प्रमाणपत्र

औरंगाबाद : भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच शहरातील काही पाकिस्तानी व इतर नागरिकांकडे पॅन, आधार कार्ड, पालिकेचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र येथील शासकीय यंत्रणांनी दिल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. चिरीमिरीसाठी पॅन, आधार कार्ड देण्यासाठी नेमलेल्या एजन्सीज्मार्फत हा सगळा प्रकार सुरू असल्याचे दिसते आहे. तर मनपाकडून देण्यात येणारे विवाह नोंदणी प्रमाणपत्रदेखील खाबूगिरी करणारे मिळवून देत असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

याप्रकरणी सुहास वानखेडे यांनी माहिती अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २०१४-२०१९ दरम्यान भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी केलेल्या अर्जासंबंधी विचारणा केली. त्यात असे आढळून आले की, भारतीय नागरिकत्व मिळण्याअगोदरच पाकिस्तानी नागरिकांच्या अर्जाला आधार कार्ड, पॅनकार्ड, लग्न प्रमाणपत्रांची कागदपत्रे जोडलेली होती. विविध शासकीय कार्यालयांमार्फत देण्यात येणारी ही कागदपत्रे नागरिकांना मिळणे ही गंभीर बाब असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. प्रशासकीय यंत्रणा चिरीमिरीसाठी महत्त्वाची कागदपत्रे काढून देण्याच्या सुविधा पुरवीत असल्याचे दिसते आहे. प्रशासकीय यंत्रणांचा वापर करून परदेशी नागरिकांना सेवा पुरविल्या जात असतील तर यंत्रणा संशयास्पद असल्याचे दिसते. भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी पात्रतेचे निकष बघता फक्त भारतात आल्यानंतर चरित्र प्रमाणपत्रा आधारे कार्यवाही केली जाते. जिल्हाधिकारी हेच दंडाधिकारी असल्याकारणाने त्यांच्या साक्षीने अर्जदारांना शपथ दिली जाते व कार्यालयामार्फत नागरिकत्वासंबंधी प्रस्ताव गृहखात्याकडे सादर केले जातात. सगळ्या प्रस्तावांवर केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्णय घेणे अभिप्रेत आहे. नागरिकत्वासंबंधीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडूनच जातात. संकलन केंद्र म्हणून जिल्हा प्रशासन काम पाहते. शहानिशा न करता प्रशासकीय यंत्रणा महत्त्वाचे दस्तावेज परदेशी नागरिकांना उपलब्ध करून देत असतील तर हे घातक असल्याचेही वानखेडे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गृहविभाग काय म्हणतोजिल्हाधिकारी कार्यालयात गृह विभागातील सूत्रांनी सांगितले, नागरिकत्व सिद्ध होण्यापूर्वी आधार कार्ड, पॅनकार्ड देता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नागरिकत्व प्रकरणात दोनच टप्प्यात काम होते. शपथ घेण्यासाठी संबंधित नागरिक येतात. येथे १२ वर्षे वास्तव्य झाल्यावरच नागरिकत्वाबाबत निर्णय होतो. संबंधितांचा मूळ पासपोर्ट ते परराष्ट्र मंत्रालयात सरेंडर करतात. त्यानंतर दूतावास कार्यालयाकडून त्यांची कागदपत्रे संबंधित जिल्हा प्रशासनाकडे वर्ग होतात. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मत असेयाप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, नागरिकत्व देण्याबाबत निर्णय झाल्यानंतरच महत्त्वाची कागदपत्रे देण्यात येतात. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादPan Cardपॅन कार्डAdhar Cardआधार कार्ड