शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

धान्याच्या अडत बाजारात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:43 IST

जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात कमालीची शुकशुकाट जाणवत आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात कमालीची शुकशुकाट जाणवत आहे. कारण, दुष्काळाचा परिणाम, जिथे दरवर्षी मार्च महिन्यात दररोज हजारो क्विंटलची आवक असते. तिथे सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला नवीन गहू, ज्वारी, हरभरा तुरळक प्रमाणात विक्रीला आणला जात आहे. यामुळे आता नाईलाजाने अडत्यांनाही परराज्यातून धान्य आणून त्याची विक्री करणे भाग पडत आहे.

दुष्काळाची भयावह परिस्थिती ग्रामीण भागात जाणवत होती; पण आता शहरातही तिचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याचा अडत बाजार आहे. येथे जिल्ह्यातील शेतकरी धान्य, कडधान्य विक्रीला आणत असतात. दरवर्षी मार्च महिन्यात येथे दररोज नवीन गहू, ज्वारीची सुरुवातीला हजारपेक्षा अधिक क्विंटल आवक होत असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे आवकवर मोठा परिणाम झाला आहे. ५० ते ६० पोते नवीन गहू, ज्वारी विक्रीला येत आहे, तर १० ते १२ पोते हरभरा येत आहे. यामुळे अडत हॉलमध्ये शुकशुकाट जाणवत आहे.

यासंदर्भात अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात मागील ३० वर्षांत गव्हाची पेरणी कमालीची घटली आहे. कारण, गव्हाला पाणी जास्त प्रमाणात लागते. सततच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील गव्हाचा पेरा कमी झाला आहे. येथील शेतकरी कमी पाण्यात तग धरून राहणारे ज्वारीचे पीक घेतात. मात्र, यंदा पाणीच कमी असल्याने ज्वारीची लागवडही कमी प्रमाणात झाली. ज्यांनी धाडस करून गहू, ज्वारीचे पीक घेतले पण कमी उत्पादनामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. यंदा गव्हाला पोषक अशी थंडी चांगली पडली होती; पण शेतात गहूच नसल्याने या थंडीचा फायदा झाला नाही. अडत व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले की, सध्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणलेल्या गव्हाला २१०० ते २३०० रुपये क्विंटलदरम्यान भाव मिळत आहे, तर शाळू ज्वारी २५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. कमी उत्पादनामुळे गव्हाची आवक आणखी आठवडाभर टिकेल.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद