शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

धान्याच्या अडत बाजारात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:43 IST

जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात कमालीची शुकशुकाट जाणवत आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात कमालीची शुकशुकाट जाणवत आहे. कारण, दुष्काळाचा परिणाम, जिथे दरवर्षी मार्च महिन्यात दररोज हजारो क्विंटलची आवक असते. तिथे सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला नवीन गहू, ज्वारी, हरभरा तुरळक प्रमाणात विक्रीला आणला जात आहे. यामुळे आता नाईलाजाने अडत्यांनाही परराज्यातून धान्य आणून त्याची विक्री करणे भाग पडत आहे.

दुष्काळाची भयावह परिस्थिती ग्रामीण भागात जाणवत होती; पण आता शहरातही तिचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याचा अडत बाजार आहे. येथे जिल्ह्यातील शेतकरी धान्य, कडधान्य विक्रीला आणत असतात. दरवर्षी मार्च महिन्यात येथे दररोज नवीन गहू, ज्वारीची सुरुवातीला हजारपेक्षा अधिक क्विंटल आवक होत असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे आवकवर मोठा परिणाम झाला आहे. ५० ते ६० पोते नवीन गहू, ज्वारी विक्रीला येत आहे, तर १० ते १२ पोते हरभरा येत आहे. यामुळे अडत हॉलमध्ये शुकशुकाट जाणवत आहे.

यासंदर्भात अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात मागील ३० वर्षांत गव्हाची पेरणी कमालीची घटली आहे. कारण, गव्हाला पाणी जास्त प्रमाणात लागते. सततच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील गव्हाचा पेरा कमी झाला आहे. येथील शेतकरी कमी पाण्यात तग धरून राहणारे ज्वारीचे पीक घेतात. मात्र, यंदा पाणीच कमी असल्याने ज्वारीची लागवडही कमी प्रमाणात झाली. ज्यांनी धाडस करून गहू, ज्वारीचे पीक घेतले पण कमी उत्पादनामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. यंदा गव्हाला पोषक अशी थंडी चांगली पडली होती; पण शेतात गहूच नसल्याने या थंडीचा फायदा झाला नाही. अडत व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले की, सध्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणलेल्या गव्हाला २१०० ते २३०० रुपये क्विंटलदरम्यान भाव मिळत आहे, तर शाळू ज्वारी २५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. कमी उत्पादनामुळे गव्हाची आवक आणखी आठवडाभर टिकेल.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद