शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

धान्याच्या अडत बाजारात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:43 IST

जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात कमालीची शुकशुकाट जाणवत आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात कमालीची शुकशुकाट जाणवत आहे. कारण, दुष्काळाचा परिणाम, जिथे दरवर्षी मार्च महिन्यात दररोज हजारो क्विंटलची आवक असते. तिथे सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला नवीन गहू, ज्वारी, हरभरा तुरळक प्रमाणात विक्रीला आणला जात आहे. यामुळे आता नाईलाजाने अडत्यांनाही परराज्यातून धान्य आणून त्याची विक्री करणे भाग पडत आहे.

दुष्काळाची भयावह परिस्थिती ग्रामीण भागात जाणवत होती; पण आता शहरातही तिचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याचा अडत बाजार आहे. येथे जिल्ह्यातील शेतकरी धान्य, कडधान्य विक्रीला आणत असतात. दरवर्षी मार्च महिन्यात येथे दररोज नवीन गहू, ज्वारीची सुरुवातीला हजारपेक्षा अधिक क्विंटल आवक होत असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे आवकवर मोठा परिणाम झाला आहे. ५० ते ६० पोते नवीन गहू, ज्वारी विक्रीला येत आहे, तर १० ते १२ पोते हरभरा येत आहे. यामुळे अडत हॉलमध्ये शुकशुकाट जाणवत आहे.

यासंदर्भात अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात मागील ३० वर्षांत गव्हाची पेरणी कमालीची घटली आहे. कारण, गव्हाला पाणी जास्त प्रमाणात लागते. सततच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील गव्हाचा पेरा कमी झाला आहे. येथील शेतकरी कमी पाण्यात तग धरून राहणारे ज्वारीचे पीक घेतात. मात्र, यंदा पाणीच कमी असल्याने ज्वारीची लागवडही कमी प्रमाणात झाली. ज्यांनी धाडस करून गहू, ज्वारीचे पीक घेतले पण कमी उत्पादनामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. यंदा गव्हाला पोषक अशी थंडी चांगली पडली होती; पण शेतात गहूच नसल्याने या थंडीचा फायदा झाला नाही. अडत व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले की, सध्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणलेल्या गव्हाला २१०० ते २३०० रुपये क्विंटलदरम्यान भाव मिळत आहे, तर शाळू ज्वारी २५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. कमी उत्पादनामुळे गव्हाची आवक आणखी आठवडाभर टिकेल.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद