शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शिवसेनेच्या गडावर नाराजीचे सुरुंग !

By admin | Updated: November 12, 2016 00:54 IST

उस्मानाबाद उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील आठही नगरपालिकांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

विशाल सोनटक्के उस्मानाबादउमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील आठही नगरपालिकांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी सामना रंगणार आहे. या निवडणुकीच्या प्रारंभी शिवसेना पक्षश्रेष्ठींनी उपनेतेपद देत प्रा. तानाजी सावंत यांच्या रुपाने जिल्ह्याला नवे नेतृत्व दिले होते. मात्र सेनेच्या अनेक बालेकिल्ल्यात बंडखोरांनी निशाण फडकावित सावंत पॅटर्नला धक्का दिला आहे. भूममध्ये तर सर्वच सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे सेनेवर नामुष्कीची वेळ आली आहे, तर उस्मानाबादेत सेनेच्या माजी नगराध्यक्षांनी बंडाच्या झेंडा हातात घेतला आहे.जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या लढतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. आठ नगराध्यक्ष आणि १६६ सदस्यांना निवडून देण्यासाठी आता पालिकांमध्ये लढत रंगणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी शहराबरोबरच ग्रामीण भागातही शिवसेनेची पाळेमुळे रुजलेली आहेत; मात्र हेवेदावे आणि अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नाही. हा प्रकार थांबविण्यासाठी शिवसेना पक्षश्रेष्ठींनी पालिका निवडणुकीची धामधूम सुरू होण्यापूर्वी प्रा. तानाजी सावंत यांची उपनेतेपदी वर्णी लावत सेनेची सूत्रे त्यांच्या हाती सोपविली. सावंत यांनीही शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्यात निष्ठावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची गर्जना केली. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उस्मानाबादेत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून ऐनवेळी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा दिला. त्यामुळे जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या नाराजीला तोंड फुटले. पर्यायाने युवासेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके आणि राजेंद्र घोडके या तिघांनी नगराध्यक्षासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यातील साळुंके यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सेनेला यश मिळाले असले तरी माजी नगराध्यक्ष घोडके यांची बंडखोरी कायम राहिल्याने सेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. भूम नगरपालिका अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेनेने मोठी तयारी केली होती. युतीसाठीही या ठिकाणी दोन्ही पक्षात बोलणी सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी युतीची बोलणी फिसकटली. प्रारंभी येथे चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात होती; मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी भूम पालिका निवडणुकीबाबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी गंभीर नाहीत, त्यांनी पक्ष म्हणून या निवडणुकीकडे कसलेही लक्ष दिले नाही असा आरोप करीत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भूममध्ये ही निवडणूक आता धनुष्यबाणाविनाच रंगणार असून, शिवसेनेसाठी ही मोठी नामुष्की मानली जात आहे.परंडा नगरपालिकेवर मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र सावंत यांची उपनेतेपदी वर्णी लागल्यानंतर शहर शिवसेनेत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि सावंत असे दोन गट दिसून लागले होते. उमेदवारांना एबी फॉर्म देताना सेनेतील ही बेकी पुन्हा प्रकर्षाने पुढे आली. १७ पैकी ४ एबी फॉर्मवर उपनेते सावंत यांनी त्यांच्या निकटवर्तीयांची नावे टाकून ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे फॉर्म सुपूर्द केल्याने या चारही वॉर्डमधून पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील दोघांनी शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेतले असले तरी दोन वॉर्डांमध्ये सेनेला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे परंड्यात यावेळी सर्व १७ जागांवर भाजपने उमेदवार उभे केल्याने सेनेला विजयासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.कळंब नगरपालिकेत चौरंगी लढत होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. मात्र या ठिकाणीही अंतर्गत गटबाजी खदखदते आहे. माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांचे निकटवर्तीय पांडुरंग कुंभार यांनी तिकीट मिळविण्यात बाजी मारली असली तरी कळंबमधील जिल्हाप्रमुख सुधीर पाटील आणि खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांचा गट कुंभार यांच्या पाठीशी कितपत उभा राहतो, यावरच येथे सेनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.