शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना घातले कांद्याचे हार

By admin | Updated: October 15, 2016 00:59 IST

कळंब :शिवसैनिकांनी शुक्रवारी कळंब येथे कृषी अधिकाऱ्यांना कांद्याने गुंफलेल्या हार घालून आपला संताप व्यक्त केला.

कळंब : तालुक्यातील पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची अस्थिर बाजारभावाच्या काळात सुयोग्य साठवणूक व्हावी यासाठी कृषी विभागाकडील अनुदानीत चाळी उभारल्या. परंतु या कांदा चाळीस अनुदान देण्यास पाच महिने निधीच नव्हता अन् पुढे आला तर दोन महिन्यापासून कृषी विभाग शेतकऱ्यांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक करत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारी कळंब येथे कृषी अधिकाऱ्यांना कांद्याने गुंफलेल्या हार घालून आपला संताप व्यक्त केला.कळंब तालुक्यात कांदा लागवडीचे प्रमाण वाढले आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतत अस्थिर बाजारभावाचा किंवा तेजी-मंदीचा सामना करावा लागतो. बहुतांशवेळा अल्पदरामुळे शेतकऱ्यांना आपला उत्पादन खर्चही पदरी पडत नाही. अशा कठीण स्थितीत हा कांदा चांगला दर येईपर्यंत ठेवावा तर कांदा हा नाशवंत असल्याने उलटपक्षी दुप्पट नुकसान होते. यामुळे यासाठी योग्य साठवणुकीसाठी अत्याधुनिक कांदा चाळ उभारणे आवश्यक असते. याच अनुषंगाने कृषी विभागाने आपल्या एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कांदा चाळ उभारणीची योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. निधीचा 'तोटा' असतानाही कळंब तालुक्यातील जवळपास ९०० प्रस्तावांना सढळ हाताने कृषी विभागाने पूर्वसंमती दिली. यातील जवळपास ५२५ शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात कृषी विभागाला अनुदान मागणीची देयकेही सादर केली. परंतु निधीच्या कमतरतेमुळे प्रथम टप्प्यात यातील ९० च्या आसपास लोकांना अनुदान देण्यात आले. उर्वरित लोकांना निधी नसल्याने आजवर रखडावे लागले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेलया शिवसैनिकांनी कन्हेरवाडी येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी तालुका कृषी कार्यालय गाठले. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे कृषी अधिकारी वसवडे यांना युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर बाराते, कन्हेरवाडीचे शाखा प्रमुख विजय कवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून कांद्यानी गुंफलेला हार घालण्यात आला. या आंदोलनात युवा सेना तालुकाप्रमुख सागर बाराते, विजय कवडे, धनंजय मिटकरी, नामदेव गायकवाड, विलास कवडे, अजित मिटकरी, वैभव कवडे, सुदाम मिटकरी, राजेंद्र कवडे, संजय कवडे आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.