शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 11:15 IST

महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ ते २० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांच्या मुंबई वा-या वाढल्या असून, प्रत्येकाने नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे

ठळक मुद्देराजकारण : इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या, नेत्यांची मनधरणी सुरू; कुणाची लागणार लॉटरी

औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ ते २० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांच्या मुंबई वाºया वाढल्या असून, प्रत्येकाने नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. जून २०१८ नंतर स्थायी समितीमध्ये अनेक अर्थपूर्ण प्रस्ताव येणार आहेत. त्यामुळे सभापतीपदावर अनेकांचा डोळा आहे. विद्यमान सभापती गजानन बारवाल यांनी स्थायी समिती सदस्य पदावर गेल्या महिन्यात प्रवेश मिळविल्यामुळे सेनेतील इच्छुकांचे देव पाण्यात आहेत.

सेनेत प्रवेश करून जर बारवाल पुन्हा सभापती झाले तर नातलग असलेले महापौर घोडेले-बारवाल यांचा वर्षभर पालिकेवर आर्थिक कंट्रोल राहील. रस्त्यांच्या, स्मार्ट सिटी कामाच्या निविदांमुळे बारवाल यांनी गेल्या महिन्यात स्वार्थापोटी पुन्हा स्थायी समितीत प्रवेश मिळविल्याचे बोलले जात आहे. बारवाल शिवसेनेत असताना त्यांना महापौर, सभागृह नेता, प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य, विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. एवढे सगळे मिळाल्यानंतरही ते सेनेच्या विरोधात मनपा निवडणुकीत अपक्ष लढले. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक करून सभापतीपद पटकावले. भाजप व अपक्ष नगरसेवकांच्या आघाडीला नाराज करून ते पुन्हा स्थायी समितीत आल्यामुळे त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. असे असले तरी त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सेनेत येताच त्यांना लगेच सभापती करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. किंबहुना त्यांचीही तशी इच्छा आहे. त्यांच्या प्रवेशाच्या हालचालींवरून शिवसेनेतील इच्छुकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. तर भाजपमधील मंडळीही बारवाल यांना जवळ करीत नसल्याचे चित्र आहे. एकाच समाजातील व्यक्तीना दोन्ही पदे दिली गेली तर इतर समाजातील नगरसेवकांमध्ये नाराजी उफाळून येण्याची शक्यता व्यक्त झाल्यामुळे त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वैद्य, वाडकर, खैरे, शिरसाट यांची नावे चर्चेतविद्यानगरचे नगरसेवक राजू वैद्य, क्रांतीचौकच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, समर्थनगरचे नगरसेवक ऋषिकेश खैरे, बन्सीलालनगरचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात वैद्य यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचे नाव पक्षपातळीवर आघाडीवर आहे. महिला नगरसेविका म्हणून संधी देण्याचे ठरले तर वाडकर यांचे नाव पुढे येईल. खा.चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश आणि आ.संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत यांची नावे चर्चेत असली तरी पक्षपातळीवर त्याबाबत निर्णय होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv Senaशिवसेना