शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

महापालिका वॉर्ड रचनेच्या विरोधात शिवसेना जाणार कोर्टात

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांसाठी ११३ वॉर्डांची रचना नैसर्गिक सीमा ओलांडून तयार करण्यात आली आहे. त्यातील २७ वॉर्डांच्या सीमा डी. पी. रोड, नद्या,

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांसाठी ११३ वॉर्डांची रचना नैसर्गिक सीमा ओलांडून तयार करण्यात आली आहे. त्यातील २७ वॉर्डांच्या सीमा डी. पी. रोड, नद्या, नाले ओलांडून केल्या आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ११३ वॉर्डांची सोडत रद्द करून नव्याने घेण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांच्याकडे केली. याप्रकरणी जैस्वाल म्हणाले, मनपाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली कामच केले नाही. २००१ च्या जनगणनेनुसार वॉर्ड रचना होऊन ९९ वॉर्ड झाले. त्या आधारे मनपाने २०१५ च्या निवडणुकीसाठी काम करणे गरजेचे होते. निवडणूक आयोग, विभागीय आयुक्तांना मनपाने टाकलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात येईल. उस्मानपुऱ्यासारखा ऐतिहासिक लढत म्हणून ओळखला जाणारा वॉर्डच नकाशातून गायब झाला आहे. वॉर्डाचे चार तुकडे चार वॉर्डांना जोडले गेले आहेत. तसाच प्रकार सिल्लेखाना, चिकलठाणा, कोकणवाडी, समर्थनगर, समतानगर या वॉर्डांबाबत झाला आहे. गारखेडा परिसरात वाढलेल्या तीन वॉर्डांच्या सीमा डी. पी. रोडला मध्ये घेऊन टाकण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, किशोर नागरे, वीरभद्र गादगे आदींची उपस्थिती होती. भाजपाचे आयोगाला निवेदनभाजपाचे नगरसेवक मधुकर सावंत यांनी विभागीय आयुक्त आणि निवडणूक आयोग आयुक्तांना निवेदन देऊन मनपा निवडणुकीसाठी टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. रमानगर वॉर्ड क्र.७३ हा अनुसूचित जाती नागरिकबहुल भाग आहे. परंतु तो महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. राखीव करण्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. मनपा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या सोडतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या वॉर्डांवरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपाकडे सोडतीवरून मोठ्या प्रमाणात हरकती व सूचनांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये नागरिकांनी सूचना व हरकतींची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतु ११ फेबु्रवारीपासून हरकती घेण्यात येणार असल्यामुळे आज मनपाने कुणाच्याही हरकती घेतल्या नाहीत.