शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

शिवसेनेत ‘दादा’गिरी

By admin | Updated: April 21, 2016 00:40 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाईतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागण्यामागे अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या मंडळींकडे जबाबदारी देणे हेच मुख्य कारण आहे

औरंगाबाद : सातारा-देवळाईतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागण्यामागे अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या मंडळींकडे जबाबदारी देणे हेच मुख्य कारण आहे या पराभवाचे पक्षप्रमुखालादेखील वाईट वाटले असून, शिवसेनेत जे ‘दादा’ सेनेचे (जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव न घेता) राज्य आले आहे. ते संपुष्टात आल्याशिवाय संघटन मजबूत होणार नसल्याचे मत उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.जिल्हाप्रमुखासह सर्व संघटनेत बदल होणे गरजेचे असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फेरबदल करण्याप्रकरणी आपले बोलणे झाले आहे. जि.प.निवडणुकीपूर्वी सर्व फेरबदल होतील. बदल केले तर नाराज भाजपकडे जातील, अशी भीती दाखविली जात आहे; परंतु जे निष्ठावान आहेत ते पक्षासोबत राहतील. जे व्यक्तीनिष्ठा ठेवून पक्षात काम करीत आहेत, ते गेले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना हवी आहे, दादासेना येथे चालणार नाही. अनेक वर्षांपासून काही पदाधिकारी एकाच पदावर आहेत, त्यामुळे त्यांना सर्व काही सोपे असल्यासारखे वाटत असून ते हवेत आहेत. सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी शिवाजीनगर येथील संघशाखेचे अस्तित्व संपुष्टात आणले. त्यामुळे संघाने सातारा-देवळाईत सेनेला हात दिला. जंजाळ यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देऊ नका,असे जिल्हाप्रमुखाला सांगितले होते. परंतु त्यांनी जंजाळ यांना प्रचारासाठी लेखी पत्र देऊन टाकले. मित्रपक्ष आमचे बोट धरून येथे आला आणि आता आमच्या पुढे निघाला आहे. संघटनेवरील पकड कमी होत असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. सातारा-देवळाई पराभवामुळे सेनेत अंतर्गत वाद विकोपाला गेले असून आगामी काळात संघटनेत काही बदल होतात की, जे चालले आहे ते बरे चालले आहे. अशी भूमिका राहणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.पालकमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावत खैरे म्हणाले, सातारा-देवळाईत मोठ-मोठी भाषणे केली, काय परिणाम झाला. वैचारिक भाषणांची गरज आहे. त्याआधारे निवडणुका जिंकता येतात. आतापासून लोकसभेची तयारी करावी लागणार आहे. उमेदवार कुणीही असो, परंतु नियोजन करावे लागेल. उमेदवारीसाठी आतापासूनच अनेकांना स्वप्न पडू लागले आहेत. उमेदवार पक्षप्रमुखच ठरवतील. सामूहिक विवाह सोहळ्यात दलित, मुस्लिम समाजालादेखील सेनेने सोबत घेतले. परंतु त्याचा काहीही परिणाम सातारा-देवळाईच्या निवडणुकीवर झाला नाही. अशी खंतही खा. खैरे यांनी व्यक्त केली.