शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

शिवसेनेत ‘दादा’गिरी

By admin | Updated: April 21, 2016 00:40 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाईतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागण्यामागे अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या मंडळींकडे जबाबदारी देणे हेच मुख्य कारण आहे

औरंगाबाद : सातारा-देवळाईतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागण्यामागे अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या मंडळींकडे जबाबदारी देणे हेच मुख्य कारण आहे या पराभवाचे पक्षप्रमुखालादेखील वाईट वाटले असून, शिवसेनेत जे ‘दादा’ सेनेचे (जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव न घेता) राज्य आले आहे. ते संपुष्टात आल्याशिवाय संघटन मजबूत होणार नसल्याचे मत उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.जिल्हाप्रमुखासह सर्व संघटनेत बदल होणे गरजेचे असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फेरबदल करण्याप्रकरणी आपले बोलणे झाले आहे. जि.प.निवडणुकीपूर्वी सर्व फेरबदल होतील. बदल केले तर नाराज भाजपकडे जातील, अशी भीती दाखविली जात आहे; परंतु जे निष्ठावान आहेत ते पक्षासोबत राहतील. जे व्यक्तीनिष्ठा ठेवून पक्षात काम करीत आहेत, ते गेले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना हवी आहे, दादासेना येथे चालणार नाही. अनेक वर्षांपासून काही पदाधिकारी एकाच पदावर आहेत, त्यामुळे त्यांना सर्व काही सोपे असल्यासारखे वाटत असून ते हवेत आहेत. सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी शिवाजीनगर येथील संघशाखेचे अस्तित्व संपुष्टात आणले. त्यामुळे संघाने सातारा-देवळाईत सेनेला हात दिला. जंजाळ यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देऊ नका,असे जिल्हाप्रमुखाला सांगितले होते. परंतु त्यांनी जंजाळ यांना प्रचारासाठी लेखी पत्र देऊन टाकले. मित्रपक्ष आमचे बोट धरून येथे आला आणि आता आमच्या पुढे निघाला आहे. संघटनेवरील पकड कमी होत असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. सातारा-देवळाई पराभवामुळे सेनेत अंतर्गत वाद विकोपाला गेले असून आगामी काळात संघटनेत काही बदल होतात की, जे चालले आहे ते बरे चालले आहे. अशी भूमिका राहणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.पालकमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावत खैरे म्हणाले, सातारा-देवळाईत मोठ-मोठी भाषणे केली, काय परिणाम झाला. वैचारिक भाषणांची गरज आहे. त्याआधारे निवडणुका जिंकता येतात. आतापासून लोकसभेची तयारी करावी लागणार आहे. उमेदवार कुणीही असो, परंतु नियोजन करावे लागेल. उमेदवारीसाठी आतापासूनच अनेकांना स्वप्न पडू लागले आहेत. उमेदवार पक्षप्रमुखच ठरवतील. सामूहिक विवाह सोहळ्यात दलित, मुस्लिम समाजालादेखील सेनेने सोबत घेतले. परंतु त्याचा काहीही परिणाम सातारा-देवळाईच्या निवडणुकीवर झाला नाही. अशी खंतही खा. खैरे यांनी व्यक्त केली.