शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

महापालिका निवडणुकीसाठी सेनेचे वॉर्डनिहाय गोपनीय सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 21:05 IST

अहवालाच्या आधारावरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देउमेदवार चाचपणी केली सुरु मतदारांचा कलही पाहणार

औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये महापालिकेची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकावण्यासाठी सेनेने वॉर्डनिहाय गोपनीय सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात उमेदवारांसंदर्भात चाचपणी, मतदारांचा कल कोणाकडे आहे, हे जाणून घेण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारावरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेत ११५ नगरसेवक निवडून येणार आहेत. बहुमतासाठी ५७ चा जादुई आकडा गाठणे आजपर्यंत कोणत्याच पक्षाला जमले नाही. महापालिकेच्या मागील सहा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपने अपक्षांच्या कुबड्या घेऊनच सत्ता स्थापन केली आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. सेनेचा पारंपरिक मित्रपक्ष दुरावला आहे. एक मित्र दूर गेला, तर दोन नवीन मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेसोबत सत्ता स्थापन करताना येतील. निवडणुकीत हे दोन्ही पक्ष सोबत घ्यावेत का? यावर सेनेत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर दोन्ही मित्रपक्षांना सोबत घ्यावे, असाही सूर सेनेतील काही मंडळी व्यक्त करीत आहेत. २०१५ मध्ये सेनेने ११३ पैकी ५९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. यामध्ये सेनेचे २९ उमेदवार विजयी झाले होते.२०२० च्या मनपा निवडणुकीत वॉर्डरचना सेनेला पोषक ठरणारी आहे. त्यामुळे ७० वॉर्डांमध्ये निवडणूक लढविण्याचा विचार पक्षातील स्थानिक नेते करीत आहेत. स्वबळावर निवडणूक लढवायची म्हटले, तर मतदारांच्या पसंतीला उतरणारे उमेदवार द्यावे लागतील. काही वॉर्डांमध्ये पुन्हा पुन्हा तेच चेहरे नकोत, असेही पक्षात जोरदार मंथन सुरू आहे. तरुणाईला जास्तीत जास्त वाव द्यावा, अशी ‘मातोश्री’ची इच्छा आहे. या सर्व परिस्थितीत सेनेकडून शहरातील काही वॉर्डांमध्ये गोपनीय सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात अनेक बाबी अत्यंत बारकाईने तपासण्यात येणार आहेत. सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांनाच पक्ष संधी देण्याची दाट शक्यता आहे.भाजपसोबत थेट मुकाबलाशहरातील ८० ते ९० टक्के वॉर्डांमध्ये सेनेला भाजपचा मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे सेना यंदा निवडणुकीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. मागील निवडणुकीत भाजपने ५० उमेदवार उभे केले होते. त्यातील २३ निवडून आले. भाजपचा हा आलेख आणखी कमी कसा करता येईल, यादृष्टीने सेनेने वॉर्डरचना, आरक्षण सोडतीत जोर लावला होता.महाआघाडीत लढायचे झाल्यासनवी मुंबई महापालिकेसाठी महाआघाडीत निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे. औरंगाबाद महापालिकेसाठी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्राथमिक स्तरावर चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. महाआघाडीत लढायचे झाल्यास सेना ७०, तर दोन्ही मित्रपक्षांना ४५ जागा देण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका