शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

औरंगाबाद ‘मध्य’ मतदारसंघावरून सेना-भाजपा अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 19:41 IST

युतीचं ठरलंय? : जागावाटपात कुणाची बाजू वरचढ ठरणार याकडे लागले सर्वांचे लक्ष

ठळक मुद्देभाजपाला ‘मध्य’ मिळेल, अशी आशा इच्छुकांना आहे.माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचा मध्य मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुतीच्या सध्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. बैठकीत जागा वाटपासाठी आकडेमोडीचे फॉर्म्युले चर्चेत येत आहेत. जागावाटपात कुणाची बाजू वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक मतदारसंघांतील युतीच्या इच्छुकांमध्ये मात्र चलबिचल वाढली असून, औरंगाबाद शहरातील ‘मध्य’ मतदारसंघ त्यापैकी एक आहे. 

युती झाल्यास सदरील मतदारसंघ कुणाकडे जाणार यावरून इच्छुक दावेदारी करू लागले आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती तुटली. भाजपकडून किशनचंद तनवाणी, तर शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल मैदानात होते. दोघांमध्ये मतविभाजन झाल्याने एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे यावेळी युती झाली, तर ‘मध्य’ची जागा सेना किंवा भाजपाला सुटली, तर तुल्यबळ लढत होईल. 

युती तुटली तर पुन्हा चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. युतीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत मध्य मतदारसंघात मतदारांची संख्यादेखील वाढली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत ३ लाख १९ हजार ६४५ मतदारसंख्या होती. त्यामध्ये आणखी काही भर पडणार आहे. १ लाख ६५ हजार १५३ पुरुष, तर १ लाख ५४ हजार ४९४ महिला मतदार मतदासंघात आहेत. २०१४ च्या तुलनेत ८३ हजार ५६७ मतदार वाढले. त्यात आणखी भर पडणार आहे. वाढलेल्या मतदारसंख्येनुसारदेखील विजयाची गणिते बदलण्याची शक्यता आहे. 

२०१४ साली काय झाले होते निवडणुकीत२०१४ साली खा. इम्तियाज जलील यांना ६१ हजार ८४३ मते मिळाली होती. ३१ टक्के मतांचे ते प्रमाण होते. शिवसेनेचे उमेदवार जैस्वाल यांना ४१ हजार ८६१ मते मिळाली होती. २५ टक्के मतांचे ते प्रमाण होते. भाजपचे उमेदवार तनवाणी हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना ४० हजारांच्या आसपास मते होती. शिवसेनेत तनवाणी विरुद्ध जैस्वाल गट, अशी फूट पडल्याचा फटका जैस्वाल यांना बसला होता. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे युतीत जागावाटपात ‘मध्य’ची जागा शिवसेनेकडेच राहील, असा युक्तिवाद कार्यकर्ते, पदाधिकारी करीत आहेत, तर मतदारसंघाच्या अदला-बदलीत भाजपाला ‘मध्य’ मिळेल, अशी आशा इच्छुकांना आहे.

अशी आहे दावेदारीमाजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी मध्य मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्या मतदारसंघातून शिवसेनाच उमेदवार देईल, असे सोशल मीडियातून मध्यंतरी जाहीर केले, तर भाजपाचे प्रबळ दावेदार असलेले किशनचंद तनवाणी यांनी मतदारसंघ युतीमध्ये कुणाला सोडायचा, याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. ‘मध्य’मधील दावेदारांचा सगळा खेळ युती होण्यावर आणि जागा कोणत्या पक्षाला सुटते, यावर अवलंबून आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा