शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ‘मध्य’ मतदारसंघावरून सेना-भाजपा अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 19:41 IST

युतीचं ठरलंय? : जागावाटपात कुणाची बाजू वरचढ ठरणार याकडे लागले सर्वांचे लक्ष

ठळक मुद्देभाजपाला ‘मध्य’ मिळेल, अशी आशा इच्छुकांना आहे.माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचा मध्य मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुतीच्या सध्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. बैठकीत जागा वाटपासाठी आकडेमोडीचे फॉर्म्युले चर्चेत येत आहेत. जागावाटपात कुणाची बाजू वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक मतदारसंघांतील युतीच्या इच्छुकांमध्ये मात्र चलबिचल वाढली असून, औरंगाबाद शहरातील ‘मध्य’ मतदारसंघ त्यापैकी एक आहे. 

युती झाल्यास सदरील मतदारसंघ कुणाकडे जाणार यावरून इच्छुक दावेदारी करू लागले आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती तुटली. भाजपकडून किशनचंद तनवाणी, तर शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल मैदानात होते. दोघांमध्ये मतविभाजन झाल्याने एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे यावेळी युती झाली, तर ‘मध्य’ची जागा सेना किंवा भाजपाला सुटली, तर तुल्यबळ लढत होईल. 

युती तुटली तर पुन्हा चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. युतीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत मध्य मतदारसंघात मतदारांची संख्यादेखील वाढली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत ३ लाख १९ हजार ६४५ मतदारसंख्या होती. त्यामध्ये आणखी काही भर पडणार आहे. १ लाख ६५ हजार १५३ पुरुष, तर १ लाख ५४ हजार ४९४ महिला मतदार मतदासंघात आहेत. २०१४ च्या तुलनेत ८३ हजार ५६७ मतदार वाढले. त्यात आणखी भर पडणार आहे. वाढलेल्या मतदारसंख्येनुसारदेखील विजयाची गणिते बदलण्याची शक्यता आहे. 

२०१४ साली काय झाले होते निवडणुकीत२०१४ साली खा. इम्तियाज जलील यांना ६१ हजार ८४३ मते मिळाली होती. ३१ टक्के मतांचे ते प्रमाण होते. शिवसेनेचे उमेदवार जैस्वाल यांना ४१ हजार ८६१ मते मिळाली होती. २५ टक्के मतांचे ते प्रमाण होते. भाजपचे उमेदवार तनवाणी हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना ४० हजारांच्या आसपास मते होती. शिवसेनेत तनवाणी विरुद्ध जैस्वाल गट, अशी फूट पडल्याचा फटका जैस्वाल यांना बसला होता. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे युतीत जागावाटपात ‘मध्य’ची जागा शिवसेनेकडेच राहील, असा युक्तिवाद कार्यकर्ते, पदाधिकारी करीत आहेत, तर मतदारसंघाच्या अदला-बदलीत भाजपाला ‘मध्य’ मिळेल, अशी आशा इच्छुकांना आहे.

अशी आहे दावेदारीमाजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी मध्य मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्या मतदारसंघातून शिवसेनाच उमेदवार देईल, असे सोशल मीडियातून मध्यंतरी जाहीर केले, तर भाजपाचे प्रबळ दावेदार असलेले किशनचंद तनवाणी यांनी मतदारसंघ युतीमध्ये कुणाला सोडायचा, याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. ‘मध्य’मधील दावेदारांचा सगळा खेळ युती होण्यावर आणि जागा कोणत्या पक्षाला सुटते, यावर अवलंबून आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा