शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी शिवकालीन व्यवस्थापन दिशादर्शक

By admin | Updated: September 6, 2015 23:59 IST

लातूर : स्वराज्यासाठी रणांगणावर मावळ्यांसह लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालविले़ शेती, पाणी,

लातूर : स्वराज्यासाठी रणांगणावर मावळ्यांसह लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालविले़ शेती, पाणी, दुष्काळ इत्यादी बाबींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करुन त्याचे उत्तम व्यवस्थापन केले़ दुष्काळ निवारणासाठी त्यांचे व्यवस्थापन आजही दिशादर्शक आहे़ जलयुक्त शिवार अभियानाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाणी व्यवस्थापन कौशल्यातून घेतली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले़अहमदपूर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या भूमीपूजन कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते़ मंचावर जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, आ़ विनायकराव पाटील, आ़संभाजी पाटील निलंगेकर, आ़सुधाकर भालेराव, आ़ प्रताप पाटील चिकलीकर, नगराध्यक्षा ललिता पुणे, माजी आग़ोविंद केंद्रे, बब्रुवान खंदाडे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, भाजपाचे प्रदेश सचिव दिलीपराव देशमुख, किसान मोर्चाचे अशोक केंद्रे, पं़स़चे सभापती अ‍ॅड़ आऱडी़ शेळके, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड़ भारत चामे, माजी आ़ राम गुंडीले, दलित मित्र रफिक अहमद यांची उपस्थिती होती़ यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रणांगणावर लढण्याचा आणि रयतेसाठी राज्य करण्याचा आदर्श आपल्याकडे उभा केला आहे़ काळाच्या पुढे जाऊन ते विचार करीत होते़ त्यांनी दाखविलेली समयसुचकता, त्यांचे नियोजन, प्रशासकीय कौशल्य, व्यवस्थापन शास्त्र शिकण्यासारखे आहे़ जलयुक्त शिवार योजना ही संकल्पना त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यावरच आधारीत आहे़ राज्यात सध्या दुष्काळ आहे़ मागील आठवड्यात सलग तीन दिवस मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील ३१ गावांचा दौरा करुन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली़ शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले़ टंचाईचा मुकाबला करण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि मजुरांना काम देण्याचे नियोजन शासनाने केले आहे़ जगाला अन्न, धान्य उपलब्ध करुन देणारा बळीराजा उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे़ तसेच राजीव गांधी जिवनदायी योजनेतून शेतकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे़ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शुल्कातून माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ तसेच जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा मिळावा, यासाठी अटी शिथील करुन चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे़ प्रास्ताविक डॉ़ सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी केले़ सुत्रसंचालन राम तत्तापूरे यांनी केले तर आभार दादासाहेब देशमुख यांनी मानले़ यावेळी आ़विनायकराव पाटील, पंचायतराज समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांचेही समयोचित भाषण झाले़