शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

इज्तेमासाठी आलेल्या साडेआठ लाख वाहनांचा शिस्तीत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 10:34 IST

लिंबेजळगाव येथील तीनदिवसीय इज्तेमाचा सोमवारी दुपारी समारोप झाल्यानंतर तेथे आलेले लाखो साथी आणि सुमारे साडेतीन लाख चारचाकी आणि पाच लाख दुचाकी वाहने शिस्तीत परतीच्या प्रवासाला निघाली. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसने जाणाºया साथींसाठी प्राधान्य देत एक मार्ग मोकळा ठेवल्याने त्यांचा प्रवासही सुकर झाला.

ठळक मुद्देइज्तेमासाठी देशभरातून लाखो साथी सुमारे साडेतीन ते चार लाख चारचाकी वाहने आणि पाच लाख दुचाकींनी आले होते. यातील हजारो वाहने इज्तेमाच्या आठ ते दहा दिवस आधी, तर काही वाहने इज्तेमाच्या आदल्या दिवशी आणि उर्वरित वाहने इज्तेमादरम्यान तेथे दाखल झाली होती.सर्व वाहने एकाच दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संयोजक आणि वाहतूक बंदोबस्तावरील अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध वाहने सोडण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : लिंबेजळगाव येथील तीनदिवसीय इज्तेमाचा सोमवारी दुपारी समारोप झाल्यानंतर तेथे आलेले लाखो साथी आणि सुमारे साडेतीन लाख चारचाकी आणि पाच लाख दुचाकी वाहने शिस्तीत परतीच्या प्रवासाला निघाली. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसने जाणार्‍या साथींसाठी प्राधान्य देत एक मार्ग मोकळा ठेवल्याने त्यांचा प्रवासही सुकर झाला.

इज्तेमासाठी देशभरातून लाखो साथी सुमारे साडेतीन ते चार लाख चारचाकी वाहने आणि पाच लाख दुचाकींनी आले होते. यातील हजारो वाहने इज्तेमाच्या आठ ते दहा दिवस आधी, तर काही वाहने इज्तेमाच्या आदल्या दिवशी आणि उर्वरित वाहने इज्तेमादरम्यान तेथे दाखल झाली होती.वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेली ही सर्व वाहने एकाच दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संयोजक आणि वाहतूक बंदोबस्तावरील अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध वाहने सोडण्याचा निर्णय घेतला. रेल्वे आणि एस.टी. महामंडळाच्या बसेस, ट्रॅव्हल्स बसेसने परत जाणार्‍या नागरिकांसाठी लिंबेजळगाव ते नगर नाका, महावीर चौकापर्यंत पादचारी मार्ग म्हणून खुला ठेवण्यात आला, तर दुसर्‍या मार्गावरून दुचाकी आणि कार सोडण्यात आल्या. मात्र, पादचार्‍यांची संख्या खूप जास्त असल्याने पादचार्‍यांनी कार आणि दुचाकींचा रस्ताही व्यापला होता. मात्र, पादचार्‍यांना प्राधान्य असल्याने वाहनचालकांनी त्यांना पुढे जाऊ दिले. दुपारी सुरू झालेला पादचार्‍यांचा प्रवास रात्री उशिरापर्यंत सुरू होता. महावीर चौकातून पादचारी रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक येथे गेले.

रात्रभर वाहने रस्त्यावरहजारो नागरिक ट्रकने आले होते. हे ट्रक इज्तेमाच्या वाहन पार्किंगमध्ये होते. रेल्वे, बसने जाणार्‍या साथींची संख्या कमी झाल्यानंतर अन्य वाहने सोडण्यात आली. आधी पायी जाणारे साथी, त्यानंतर दुचाकी, त्यानंतर कार आणि सर्वात शेवटी ट्रक आणि खाजगी बसेस सोडण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रंदिवस ड्यूटीवरपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपायुक्त विनायक ढाकणे यांच्यासह तीन उपायुक्त, सहायक आयुक्त सी.डी. शेवगण यांच्यासह आठ सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, रामेश्वर रोडगे, मनोज पगारे यांच्यासह १४ पोलीस निरीक्षक, ८२ पोलीस उपनिरीक्षक आणि १ हजार ३०० वाहतूक पोलीस तैनात होते. त्यांच्या मदतीला स्वयंसेवक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत होते.

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८