शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

महापौरपदासाठी शीला भवरेंची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:02 IST

नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने विनय गिरडे यांना संधी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेङ: नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने विनय गिरडे यांना संधी दिली आहे.महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी मुदत होती. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार होते. काँग्रेसकडून महापौरपदासाठी गुरुवारी शीलाताई भवरे, दीक्षा धबाले, ज्योती कदम, ज्योती रायबोले यांनी अर्ज घेतले होते. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रशांत तिडके, विनय गिरडे आणि सतीश देशमुख यांनी अर्ज घेतले होते. यापैकीच महापौर आणि उपमहापौरपदाची संधी मिळणार हे स्पष्ट होते.शुक्रवारी काँग्रेसकडून महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार ठरविण्याबाबत शहरातील आयटीएम कॉलेजमध्ये प्रमुख नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर महापौरपदासाठी काँग्रेसने शीलाताई भवरे यांची निवड अंतिम केली तर उपमहापौरपदासाठी गिरडे यांना अर्ज भरण्याचे निर्देश दिले.हे आदेश मिळाल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी महापालिका गाठली. येथे आ. राजूरकर, आ. सावंत यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी शीलाताई भवरे यांनी तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे यांनी आपले अर्ज भरले. यावेळी महापौर शैलजा स्वामी, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, आनंद चव्हाण, उमेश पवळे, संगीता पाटील डक, संजय मोरे आदींची उपस्थिती होती.भाजपाकडूनही या दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आला आहे. महापौरपदासाठी भाजपकडून बेबीताई गुपिले तर उपमहापौरपदासाठी गुरुप्रितकौर सोडी यांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे महापौर व उपमहापौरदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.उमेदवार दाखल केल्यानंतर माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी काँग्रेसला नांदेडकरांनी दिलेला बहुमताचा कौल हा जबाबदारी वाढवणारा असल्याचे सांगितले. काँग्रेसने जनतेला दिलेली सर्व आश्वासने आगामी काळात पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकहाती सत्ता असली तरी ती जबाबदारीने सांभाळली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. अमरनाथ राजूरकर यांनीही अशोकरावांच्या नेतृत्वावर नांदेडकरांनी विश्वास ठेवून काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिल्याचे सांगितले. आगामी काळातही काँग्रेसला जिल्ह्यात तसेच राज्यात चांगले यश मिळणार आहे़ त्याची सुरुवात नांदेडपासून झाली असल्याचेही ते म्हणाले़