शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महापौरपदासाठी शीला भवरेंची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:02 IST

नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने विनय गिरडे यांना संधी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेङ: नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने विनय गिरडे यांना संधी दिली आहे.महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी मुदत होती. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार होते. काँग्रेसकडून महापौरपदासाठी गुरुवारी शीलाताई भवरे, दीक्षा धबाले, ज्योती कदम, ज्योती रायबोले यांनी अर्ज घेतले होते. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रशांत तिडके, विनय गिरडे आणि सतीश देशमुख यांनी अर्ज घेतले होते. यापैकीच महापौर आणि उपमहापौरपदाची संधी मिळणार हे स्पष्ट होते.शुक्रवारी काँग्रेसकडून महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार ठरविण्याबाबत शहरातील आयटीएम कॉलेजमध्ये प्रमुख नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर महापौरपदासाठी काँग्रेसने शीलाताई भवरे यांची निवड अंतिम केली तर उपमहापौरपदासाठी गिरडे यांना अर्ज भरण्याचे निर्देश दिले.हे आदेश मिळाल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी महापालिका गाठली. येथे आ. राजूरकर, आ. सावंत यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी शीलाताई भवरे यांनी तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे यांनी आपले अर्ज भरले. यावेळी महापौर शैलजा स्वामी, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, आनंद चव्हाण, उमेश पवळे, संगीता पाटील डक, संजय मोरे आदींची उपस्थिती होती.भाजपाकडूनही या दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आला आहे. महापौरपदासाठी भाजपकडून बेबीताई गुपिले तर उपमहापौरपदासाठी गुरुप्रितकौर सोडी यांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे महापौर व उपमहापौरदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.उमेदवार दाखल केल्यानंतर माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी काँग्रेसला नांदेडकरांनी दिलेला बहुमताचा कौल हा जबाबदारी वाढवणारा असल्याचे सांगितले. काँग्रेसने जनतेला दिलेली सर्व आश्वासने आगामी काळात पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकहाती सत्ता असली तरी ती जबाबदारीने सांभाळली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. अमरनाथ राजूरकर यांनीही अशोकरावांच्या नेतृत्वावर नांदेडकरांनी विश्वास ठेवून काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिल्याचे सांगितले. आगामी काळातही काँग्रेसला जिल्ह्यात तसेच राज्यात चांगले यश मिळणार आहे़ त्याची सुरुवात नांदेडपासून झाली असल्याचेही ते म्हणाले़