शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

महापौरपदी शेख बिनविरोध; उपमहापौर कांबळे ‘जिंकले’

By admin | Updated: November 13, 2014 00:52 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली,

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी कैलास कांबळे हे ५० मते घेत ४२ मतांनी शिवसेनेच्या संभाजी बसपुरे यांचा पराभव करून निवडून आले. बसपुरे यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी महापौरपदी अख्तर शेख व उपमहापौरपदी कैलास कांबळे यांची निवड झाल्याचे घोषित केले.लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरांची २० नोव्हेंबर रोजी मुदत संपणार असल्याने नव्या महापौरांची १२ नोव्हेंबर रोजी निवड करण्यात आली. महापौरपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेस विरुद्ध शिवसेना उमेदवार आमने-सामने होते. बुधवारी विशेष सभेत हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली इंद्राळे यांनी अर्ज माघार घेतला. उपमहापौरपदासाठीही दोन अर्ज वैध ठरले. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक झाली. यात काँग्रेसचे कैलास कांबळे यांना ५० तर शिवसेनेचे बसपुरे यांना ८ मते मिळाली. निवडीनंतर महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे यांचा मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल, राकाँचे गटनेते मकरंद सावे, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, शिवसेनेच्या गटनेत्या सुनीता चाळक यांनी सत्कार केला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदेकर, उप जिल्हाधिकारी विकास खपले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. (प्रतिनिधी)सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. महापौरपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली इंद्राळे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. माघार घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली होती. मात्र मुदतीत अर्ज माघार घेण्यात आला नसल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात कैलास कांबळे यांना काँग्रेसचे ४८, रिपाइंचे २ अशी ५० मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार संभाजी बसपुरे यांना शिवसेनेचे ६ व राष्ट्रवादी काँग्रेसची २ अशी ८ मते मिळाली. खा. रामदास आठवलेंची रिपाइं लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत यापूर्वी ‘शिवशक्ती’सोबत राहिली आहे. परंतु, आता महायुती तोडून ती काँग्रेससोबत जोडली गेली.