शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

‘ती’ निवड बोगस

By admin | Updated: July 9, 2014 00:34 IST

जालना : गारपीटग्रस्तांची निवड करताना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसूनच आपल्या मर्जीतल्या लोकांची नावे त्यात समाविष्ट केली, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी केली.

जालना : जिल्ह्यात गारपीटग्रस्तांची निवड करताना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसूनच आपल्या मर्जीतल्या लोकांची नावे त्यात समाविष्ट केली, असा आरोप करून वंचित गावांचे, शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत केली.मंगळवारी येथील एका हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोणीकर म्हणाले की, शासनाने गारपीटग्रस्तांच्या याद्या कार्यालयात बसूनच केल्या आहेत. त्यासाठी आपण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात १९ जून रोजी अ‍ॅड. राजेंद्र ढासाळकर यांच्यामार्फत एक याचिका दाखल केली. ही याचिका न्यायालयाने मेरिटमध्ये घेतली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे नियमाप्रमाणे करण्यात आले नाहीत. गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देता येते. मात्र ज्या शेतकऱ्यांचे १० एकराचे नुकसान झाले, त्यांना १ एकराची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. तसेच ज्या शेतकऱ्यांचे ५ एकरचे नुकसान झाले, त्यांना अर्धा एकर, दीड एकर नुकसान भरपाई देण्यात आली, असा आरोपही लोणीकर यांनी केला. लोणीकर म्हणाले, आपण न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून प्रशासनाने कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने नुकसान भरपाई मंजूर केली, हे आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रकार परिषदेस भाजपाचे जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, शहराध्यक्ष वीरेंद्र धोका, सागर बर्दापूरकर, सुनील दायमा आदींची उपस्थिती होती. बबनराव लोणीकर यांचा आरोपमंगळवारी औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे व न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, पुनर्वसन सचिव, महसूल सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्ह्यातील आठही तालुक्यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना याबाबत नोटिसा बजावण्यात आल्याचे लोणीकर यांनी सांगितले.