शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

शहरात ‘झोपु’ योजना

By admin | Updated: February 14, 2015 00:12 IST

औरंगाबाद : मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जाणार असून, या अंतर्गत शहरातील ५२ झोपडपट्ट्यांमधील गरिबांना मोफत घरे दिली जातील,

औरंगाबाद : मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जाणार असून, या अंतर्गत शहरातील ५२ झोपडपट्ट्यांमधील गरिबांना मोफत घरे दिली जातील, अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी आज औरंगाबादेत केली. सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री कदम यांनी वरील घोषणा केली. यावेळी महापौर कला ओझा, आ. संजय शिरसाट, आ. अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक विकास जैन आदींची उपस्थिती होती. कदम म्हणाले, औरंगाबाद शहरात ५२ झोपडपट्ट्या आहेत. या सर्वांना मोफत चांगली घरे दिल्यास त्यांचे जीवनमान सुधारूशकेल. याचा विचार करून आम्ही औरंगाबादेत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे ठरविले आहे. याबाबत मनपाच्या येत्या २० फेबु्रवारीच्या सर्वसाधारण सभेत तसा ठरावही मंजूर करून घेण्यात येणार आहे. यामध्ये खाजगी विकसकाकडून झोपडपट्टीच्या जागेवर गरिबांसाठी मोफत घरे बांधून घेतली जातील. त्या बदल्यात संबंधित विकसकाला काही मोकळी जागा मिळेल.या योजनेमुळे त्या- त्या भागात रस्ते, मैदाने या सुविधा उपलब्ध होऊन शहराच्या सौंदर्यातही भर पडेल. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, लवकरच ही योजना येथे लागू होईल, असेही कदम यांनी जाहीर केले. पुनरुज्जीवन करणारमहात्मा फुले महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या या महामंडळामार्फत गरजूंना कर्ज मिळणे बंद झाले आहे. मात्र ही गत मागच्या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच झाली आहे. त्यामुळे महामंडळाच्या कामाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर या महामंडळाचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.