शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

गंभीर जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: April 11, 2017 00:04 IST

येडशी : शेतजमीन वाटणीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका शेतकऱ्याचा उस्मानाबादेतील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला़

येडशी : शेतजमीन वाटणीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका शेतकऱ्याचा उस्मानाबादेतील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला़ या प्रकरणी मयताच्या भावाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील तानाजी सुभाष शेळके व त्यांच्या पत्नी रागिनी शेळके हे दोघे ८ एप्रिल रोजी सायंकाळी शेतात काम करीत होते़ त्यावेळी तानाजी यांचा भाऊ दिगांबर सुभाष शेळके हा तेथे आला़ त्या दोघांना ‘तुम्ही शेतात काम करू नका, काम बंद करा’ असे म्हणून शिवीगाळ करू लागला़ त्यामुळे ते दोघे काम बंद करून बैलगाडीने येडशी येथील घरी आले़ घरी आल्यानंतर तानाजी शेळके हे जनावरे दावणीला बांधत होते़ यावेळी दिगांबर हा शेतीच्या वाटणीवरून त्याचे वडिल सुभाष शेळके यांना शिवीगाळ करून मारहाण करीत होता़ तेव्हा तानाजी शेळके यांनी भांडण सोडवून वडिलांना का मारहाण करतोस असा जाब विचारला़ त्यानंतर तानाजी शेळके हे अंगणातील दावणीला जनावरे बांधत होते़ त्यावेळी दिगांबर सुभाष शेळके याने हातात टिकावाचा लाकडी दांड्याने तानाजी यांच्या डोक्यात जबर वार केला़ डोक्यात जबर वार झाल्याने तानाजी शेळके हे तेथेच चक्कर येऊन पडले़ तेथील नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी उस्मानाबाद येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते़ मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी तानाजी शेळके यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, घटनेनंतर रागिनी शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिगांबर शिंदे याच्याविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तर तानाजी शेळके यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात भादंवि ३०२ हे कलम वाढविण्यात आले आहे़ दरम्यान, शेतजमिनीच्या वादातून भावानेच भावाचा खून केल्याच्या घटनेने येडशीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)