शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

चातुर्मास कलश स्थापना

By admin | Updated: July 23, 2016 01:18 IST

औरंगाबाद : राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेकडो भाविकांच्या साक्षीने चातुर्मास कलश स्थापन करण्यात आला.

औरंगाबाद : राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेकडो भाविकांच्या साक्षीने चातुर्मास कलश स्थापन करण्यात आला. यावेळी आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचा २६ वा दीक्षा दिवस महोत्सवही उत्साहात साजरा करण्यात आला.शुक्रवारी सर्वप्रथम राजाबाजार जैन मंदिरातून दुपारी १ वाजता आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघ सान्निध्यात चातुर्मास कलशाची शोभायात्रा काढण्यात आली. अग्रसेन भवन चातुर्मास कलश स्थापनेचा मान डॉ.रमेश बडजाते परिवाराला मिळाला. तर धर्मतीर्थ कलश स्थापनेचा मान शिखरचंद अजमेरा परिवाराला मिळाला. तीर्थरक्षा कलश स्थापनेचा मान कैलासचंद कासलीवाल परिवाराला मिळाला. यानंतर आचार्यश्रींना दीक्षा दिवसानिमित्त पिंछी, कमंडल व शास्त्र प्रदान करण्याचा मान जयपूर येथील दीक्षांत हाडा परिवाराला मिळाला. आचार्यश्रींचे पादप्रक्षालन चिरंजीलाल बजाज परिवाराने केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध महिला मंडळ, युवा मंडळ, पाठशाळेने सांस्कृतिक कार्यक्रमाने मने जिंकली. यशस्वीतेसाठी चातुर्मास समितीचे अध्यक्ष ललित पाटणी, अशोक अजमेरा, डॉ.रमेश बडजाते, एम. आर. बडजाते, दिलीप कासलीवाल, चांदमल चांदीवाल, महावीर पाटणी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. \भ्रूणहत्या करणारे मोठे राक्षसऔरंगाबाद : भ्रूणहत्या करणारे, हुंड्याचे लोभ असणारे सर्वात मोठे राक्षस आहेत, ते कधीही देवीचे उपासक बनू शकत नाही, असे परखड मत राष्ट्रसंत कमलमुनि कमलेश यांनी येथे व्यक्त केले. वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने महावीर भवन येथे सुरू असलेल्या चातुर्मास प्रवचनात ते भाविकांना मार्गदर्शन करीत होते.महाराज पुढे म्हणाले की, जो व्यक्ती आई, बहीण, पत्नीला त्रास देतो आणि मंदिरात जाऊन देवीची आरती करण्याचे ढोंग करतो, तो स्वत:च्या आत्म्याला व परमात्म्याला धोका देत आहे. त्यापेक्षा मोठे पाप कोणतेच नाही. सर्व धर्माच्या लोकांनी मिळून स्त्रियांच्या रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी विश्वशांती कल्याणासाठी णमोकार महामंत्राच्या कलशाचे लोकार्पण करण्यात आले. हा कलश चातुर्मास काळात प्रत्येक भाविकाच्या घरोघरी जाणार आहे. हा कलश संस्कार, क्रांती, संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे, असे यावेळी महाराजांनी सांगितले.