शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

चातुर्मास कलश स्थापना

By admin | Updated: July 23, 2016 01:18 IST

औरंगाबाद : राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेकडो भाविकांच्या साक्षीने चातुर्मास कलश स्थापन करण्यात आला.

औरंगाबाद : राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेकडो भाविकांच्या साक्षीने चातुर्मास कलश स्थापन करण्यात आला. यावेळी आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचा २६ वा दीक्षा दिवस महोत्सवही उत्साहात साजरा करण्यात आला.शुक्रवारी सर्वप्रथम राजाबाजार जैन मंदिरातून दुपारी १ वाजता आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघ सान्निध्यात चातुर्मास कलशाची शोभायात्रा काढण्यात आली. अग्रसेन भवन चातुर्मास कलश स्थापनेचा मान डॉ.रमेश बडजाते परिवाराला मिळाला. तर धर्मतीर्थ कलश स्थापनेचा मान शिखरचंद अजमेरा परिवाराला मिळाला. तीर्थरक्षा कलश स्थापनेचा मान कैलासचंद कासलीवाल परिवाराला मिळाला. यानंतर आचार्यश्रींना दीक्षा दिवसानिमित्त पिंछी, कमंडल व शास्त्र प्रदान करण्याचा मान जयपूर येथील दीक्षांत हाडा परिवाराला मिळाला. आचार्यश्रींचे पादप्रक्षालन चिरंजीलाल बजाज परिवाराने केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध महिला मंडळ, युवा मंडळ, पाठशाळेने सांस्कृतिक कार्यक्रमाने मने जिंकली. यशस्वीतेसाठी चातुर्मास समितीचे अध्यक्ष ललित पाटणी, अशोक अजमेरा, डॉ.रमेश बडजाते, एम. आर. बडजाते, दिलीप कासलीवाल, चांदमल चांदीवाल, महावीर पाटणी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. \भ्रूणहत्या करणारे मोठे राक्षसऔरंगाबाद : भ्रूणहत्या करणारे, हुंड्याचे लोभ असणारे सर्वात मोठे राक्षस आहेत, ते कधीही देवीचे उपासक बनू शकत नाही, असे परखड मत राष्ट्रसंत कमलमुनि कमलेश यांनी येथे व्यक्त केले. वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने महावीर भवन येथे सुरू असलेल्या चातुर्मास प्रवचनात ते भाविकांना मार्गदर्शन करीत होते.महाराज पुढे म्हणाले की, जो व्यक्ती आई, बहीण, पत्नीला त्रास देतो आणि मंदिरात जाऊन देवीची आरती करण्याचे ढोंग करतो, तो स्वत:च्या आत्म्याला व परमात्म्याला धोका देत आहे. त्यापेक्षा मोठे पाप कोणतेच नाही. सर्व धर्माच्या लोकांनी मिळून स्त्रियांच्या रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी विश्वशांती कल्याणासाठी णमोकार महामंत्राच्या कलशाचे लोकार्पण करण्यात आले. हा कलश चातुर्मास काळात प्रत्येक भाविकाच्या घरोघरी जाणार आहे. हा कलश संस्कार, क्रांती, संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे, असे यावेळी महाराजांनी सांगितले.