शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तार्इंच्या पालखीची २५० वर्षांपासून बीडकरांकडून सेवा

By admin | Updated: June 19, 2017 23:45 IST

बीड : आषाढी वारीसाठी मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबार्इंची पालखी मंगळवारी बीड शहरात येत आहे.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आषाढी वारीसाठी मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबार्इंची पालखी मंगळवारी बीड शहरात येत आहे. ३०८ वर्षांची परंपरा असलेली ही पालखी बीडकरांच्या श्रद्धेची, भावनेची आणि अस्मितेची बनली आहे. पालखीचे आगमन आणि प्रस्थानावेळी बीडमध्ये वरुणराजा स्वागत करतो अशी अनुभूती भाविकांना आलेली आहे. मुक्ताईच्या पदस्पर्शाने बीडनगरी धन्य होते.आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र महाराज हरणे यांच्या नेतृत्वात हा पालखी सोहळा सुरू होतो. मजल-दरमजल करीत टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचा ३३ दिवस प्रवास सुरू असतो. सुधाकर पाटील हे पालखी मार्गावरील व्यवस्थेची जबाबदारी सांभाळतात. बीड येथील माळीवेस हनुमान मंदिरात कितीतरी वर्षांपासून पालखी मुक्कामाची परंपरा आहे. संत मुक्ताई पालखीचे आगमन बीडच्या भाविकांसाठी जणू दसरा, दिवाळी असते. अनेक महिला भगिनी नवस फेडण्यासाठी आदिशक्ती मुक्ताईची खणा, नारळाने ओटी भरतात. नवसपूर्तीचा आनंदही अनेक भाविकांमध्ये पहायला मिळतो. हनुमान मंदिर विश्वस्तांच्या वतीने पालखीच्या एक दिवस मुक्कामाची निवास आणि भोजन व्यवस्था केली जाते. त्यानंतर पालखी शहरातील बालाजी मंदिराकडे प्रस्थान होते. तेथे पालखीचा मुक्काम असतो. नंतर पालखी पालीच्या दिशेने प्रस्थान करते. हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे शांतीलाल पटेल, चंद्रकांत पाटील, विश्वासराव मनसबदार, अ‍ॅड. प्रसाद मनसबदार, संपतराव मारकड, सुरेश नहार, राजाभाऊ बाहेगव्हाणकर, लक्ष्मणराव जाधव, रमेश पाटील यांच्यासह भक्तमंडळी वारकरी भाविकांचे आदिरातिथ्य करतात. हनुमान मंदिर ट्रस्ट, रोटरी क्लब आॅफ बीड सिटीच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. डॉक्टरांची ‘निमा’ संघटना तसेच महाबली सेवा परिवाराचा यात सहभाग असतो. याशिवाय शहरातील विविध सामाजिक संघटना आणि भाविकांच्या वतीने वारकऱ्यांची काळजी घेतली जाते.