शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरमध्येच जि.प., पं.स. पदाधिकारी निवड

By admin | Updated: August 27, 2014 23:38 IST

नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शासनाने काढलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

हिंगोली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शासनाने काढलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला आहे.जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर पंचायत समिती सभापतीपदासाठी १४ सप्टेंबर रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. शिवसेनेला येथे स्पष्ट बहुमत आहे. पक्षीय बलाबल विचारात घेतले तर शिवसेना-२७, राष्ट्रवादी कॉंग्रेस-१0, कॉंग्रेस-९, अपक्ष-४ अशी स्थिती आहे. त्यातही तीन अपक्ष कॉंग्रेस-राकॉंकडेच झुकलेले आहेत. मात्र तरीही सेनेला कोणाच्याही कुबड्या न घेता सत्तास्थापना करता आली होती. विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये सर्वच शिवसेनेचे सदस्य आहेत. आगामी काळात काही राजकीय घडामोडी घडून सत्तेच्या सारिपाटावर वेगळे बदल पहायला मिळतील, अशी आशा धुसर आहे. मात्र गटातटाच्या राजकारणाची किनार लाभल्यास तसे काही घडल्यास नवल वाटण्याचेही कारण नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही त्यासाठी नकार देईल, अशी स्थिती नाही. यापूर्वी जि.प.त तसा प्रयोगही झालेला आहे. सेनेने कधी राकॉं तर कधी कॉंग्रेसशी सोबत करून सत्तेची फळे चाखलेली आहेत. त्यात आता पूर्ण बहुमत असल्याने शिवसेनेस कोणालाही सोबत घेण्याची गरज नसली तरी गटातटातील पराकोटीचा संघर्ष वेगळी वाट निवडायला भाग पाडू शकतो.पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवडही वेळेवरच म्हणजे १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. कळमनुरी येथे अनुसूचित जाती महिला, हिंगोलीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वसमतमध्ये सर्वसाधारण महिला तर औंढा व सेनगावमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी सभापतीपदाचे आरक्षण आहे. त्यामुळे पंचायत समित्यांतही आपापल्या स्तरावर मोर्चेबांधणीची प्रक्रिया पं.स. सदस्यांनी सुरू केली आहे.मागील काही दिवसांपासून आचारसंहितेमुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळेल, अशी चर्चा होत होती. शिवाय काहीजण प्रशासक येईल, अशी चर्चा करीत होते. मात्र शासनाने वेळेपूर्वीच ही याबाबत आदेश काढून या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. अचानक झालेल्या या घोषणेनंतर आज जि.प. सदस्यांनी आपापल्या पक्षातील गटांना तसेच पक्षश्रेष्ठींना गळ घालण्यास प्रारंभ केला आहे. याचदरम्यान विधानसभा निवडणुकाही येत असल्याने त्याचाही या निवडणुकीवर परिणाम होईल, अशी चिन्हे आहेत. काही नाराज व विधानसभा इच्छुकांना या माध्यमातून खूष करण्याची संधी आहे. तसेच यात कोणाची नाराजी झाल्यास ती अंगाकडेही येण्याची शक्यता नाकारता येत नाही.