शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करावा

By admin | Updated: July 6, 2014 00:34 IST

औरंगाबाद : भारत कृषिप्रधान देश आहे. येथील ८० टक्के जनता कृषी क्षेत्राशी जोडली गेली आहे.

औरंगाबाद : भारत कृषिप्रधान देश आहे. येथील ८० टक्के जनता कृषी क्षेत्राशी जोडली गेली आहे. या क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता केंद्र सरकारने कृषीचा स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करावा, अशी मागणी शहरातील बी-बियाणे वितरक व शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा संपूर्ण जून महिना कोरडा ठणठणीत गेला. त्याचा फटका अर्थातच शेती क्षेत्राला आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. संपूर्ण देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या धर्तीवर येत्या ११ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. सर्वांप्रमाणे कृषी क्षेत्राचेही लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. शेतीच्या विकासासाठी नवीन सरकार कोणत्या योजना जाहीर करते, यासाठी सर्वांची उत्सुकता वाढली आहे. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करावा, अशी मागणी कृषी क्षेत्रातील बी-बियाणे वितरक, शेतकऱ्यांनी केली आहे. आता केंद्राचा अर्थसंकल्प तयार झाला आहे. मात्र, पुढील वर्षापासून रेल्वेप्रमाणे कृषीचाही स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा या अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी बी-बियाणे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी केली. मँगो ग्रोअर्स असोसिएशनचे सचिव त्र्यंबक पाथ्रीकर यांनी सांगितले की, गारपीट आणि आता दुष्काळी परिस्थिती यामुळे शेती करणे बेभरवशाचे झाले आहे. दरवर्षी कोणती तरी नैसर्गिक आपत्ती येत असते आणि त्यात शेतीचे मोठे नुकसान होत असते. यासाठी केंद्राने शेतीसाठी नुकसानभरपाईच्या स्वतंत्र निधीची तरतूद करावी. जेणेकरून आपत्तीच्या वेळी तो निधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देता येईल. खताची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी. ठिबक सिंचनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. त्याकरिता विद्राव्य खताला सरकारने सबसिडी द्यावी. आधारभूत किमतीमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात यावी. बियाणे वितरक जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता रासायनिक खते व कीटकनाशकांच्या किमती कमी करण्यात याव्यात. केंद्र सरकारने पीक विमा सक्तीचा करावा. जेणेकरून नैसर्गिक आपत्ती आल्यास त्या विम्याचा शेतकऱ्यास आधार होईल. अमित नावंदर यांनी सांगितले की, कृषीसाठी मोफत वीज न देता २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, जेणेकरून पिकाला योग्यवेळी पाणी मिळेल व उत्पादन दुपटीने वाढेल. जितेंद्र पाटणी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प मांडण्यात यावा. प्रत्येक शेतीमालाचा हमीभाव ठरविण्यात यावा.