शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

टंचाईच्या काळात पाणी विकणे अधर्म

By admin | Updated: February 8, 2016 00:20 IST

हणमंत गायकवाड , लातूर पाणी नैसर्गिक गरज आहे़ वास्तविक पाहता पाणी, अग्नी, वायू या निसर्गनिर्मित बाबी आहेत़ त्या विकण्याच्या वस्तू नाहीत़ मानव निर्मितही नाहीत, निसर्गनिर्मित आहेत़

हणमंत गायकवाड , लातूरपाणी नैसर्गिक गरज आहे़ वास्तविक पाहता पाणी, अग्नी, वायू या निसर्गनिर्मित बाबी आहेत़ त्या विकण्याच्या वस्तू नाहीत़ मानव निर्मितही नाहीत, निसर्गनिर्मित आहेत़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाणी विकणे अधर्मच आहे़ दुसऱ्याच्या दु:खाने दु:खी होऊन त्याला मदत करणे हा खरा मानव धर्म आहे़ सध्या पाण्याची अडचण आहे़ या अडचणीत पाण्याचा व्यवसाय करुन पैसा कमाविणे हे अधर्मच आहे़ तो कोणीही करु नये, असा उपदेश लातुरातील धर्मगुरुंनी दिला आहे़जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ टंचाईचा फायदा घेत पाणी विक्रेत्यांनी जिल्हाभर मोठा व्यवसाय थाटला आहे़ त्यातून लाखो रुपयांची नफेखोरी केली जात आहे़ दिवसाला ४० लाखांपर्यंत पाण्याचा व्यवहार होत आहे़ सामान्य नागरिकांना पाणी विकत घेणे परवडत नाही, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धर्मगुरुंशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पाणी निसर्गनिर्मित आहे़ ती विकण्याची वस्तू नाही़ संकटकाळी पाणी एकमेकांना दिले पाहिजे़ अडचणीच्या काळात हा व्यवसाय होणे माणुसकीला धरुन नाही, असे संत वचनच धर्मगुरुंनी आपल्या हितोपदेशात सांगितले. मोफत पाणीपुरवठ्याचा संदेशच सर्वधर्मीय गुरुंनी दिला आहे.गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, संत एकनाथ महाराज गंगेवरुन पाणी घेऊन देवाची पूजा करण्यासाठी निघाले होते़ वाटेत एक गाढव पाण्याअभावी तडफडत होते़ संत एकनाथ महाराजांनी देवाला घेतलेले पाणी त्या गाढवाला पाजले आणि त्याचे प्राण वाचविले़ आज अशीच परिस्थिती आहे़ पाण्याची गरज सर्वांनाच आहे़ ज्याच्याकडे पाणी आहे, त्याने दुसऱ्याला दिलेच पाहिजे़ सर्व्हिस म्हणून नव्हे तर सेवा म्हणून ते दिले पाहिजे़ इतकी वर्षे आपण पाणी विक्री केली़ त्यावेळची परिस्थिती चांगली होती़ आता परिस्थिती चांगली नाही़ त्यामुळे पाणी विक्रीचा व्यवसाय करणे अधर्मच आहे़ जो लोकांचा त्रास जाणतो आणि मदत करतो तोच खरा माणूस आणि मानवधर्म आहे़ माणूस अडचणीत असतो, त्यावेळी जो अडचण सोडवितो ती त्याची खरी सेवा़ मूल्य घेऊन सेवा देणे म्हणजे सर्व्हिस आहे़ पाणी विक्रीतून सर्व्हिस देण्याऐवजी मोफत देऊन सेवा करा, हीच खरी ईश्वर सेवा ठरेल, असेही गहिनीनाथ महाराज म्हणाले़ सेवा म्हणजे परमार्थ आहे़ आता पाण्याची टंचाई आहे़ अशा काळात ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी परमार्थ करावा, असेही गहिनीनाथ महाराज म्हणाले़ डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर म्हणाले, टंचाईच्या काळातच काय, भरपूर पाणी असतानाही पाण्याचा व्यवसाय करणे चुकीचे आहे़ पाणी, अग्नी, वायू या निसर्गनिर्मित बाबी आहेत़ त्या विकण्याचा कोणालाही अधिकार नाही़ निसर्गाने सर्व जीवांसाठी त्याची निर्मिती केली आहे़ मानव निर्मित या बाबी नाहीत़ त्यामुळे पाणी विकू नये़ विकले तर तो अधर्मच आहे़ माणूस, प्राणी, सर्वच जीवघटक आज पाण्यासाठी त्रस्त आहेत़ अशा स्थितीत गैरफायदा घेऊन पैसा कमाविण्यासाठी हा व्यवसाय करणे चुकीचे आहे़ शास्त्रात याला योग्यता नाही़ म्हणून जे कोणी पाण्याचा व्यवसाय करुन पैसा कमावीत असतील त्यांनी तो थांबवावा़ ज्यांच्याकडे पाणी असेल तर त्यांनी मोफत देऊन सेवा करावी, हाच आपला धर्म आहे़ हीच ईश्वर सेवा आहे़ या सेवेपेक्षा दुसरी कोणतीही सेवा मोठी नाही, असेही डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले.पाणी अल्लाहची देण आहे़ पाणी विकणे आणि पाण्याचा व्यवसाय करणे गैर आहे़ पाणी सेवाभावी वृत्तीने मोफत दिले जावे़ जर एखाद्याकडे पाणी असून पोहोचविण्याची ऐपत नसेल तर तो वाहतुकीचा नाममात्र खर्च घेवू शकता़े प्रेषित मुहम्मद पैगम्बरांच्या काळात पाण्याची टंचाई जाणवली होती़ तेव्हा त्यांनी हजरत उस्मान गणी रजी़ यांना एका यहुदी व्यक्तीकडे असलेली विहीर (बीरे रूहा) घेण्यास सांगितले होते़ तेव्हा तो यहुदी व्यक्ती विकण्यास तयार नव्हता, त्याला त्यापासून भरपूर फायदा मिळायचा़ परंतु, गणी यांनी त्यांना अर्धी विहीर विकत देण्याची मागणी केली़ तेव्हा तो राजी झाला़ एक दिवस तो व्यक्ती पैशाने पाणी विकायचा आणि दुसऱ्या दिवशी हजरत उस्मान गणी मोफत पाणी द्यायचे़ नागरिक मोफत पाण्याच्या दिवशी पूर्ण पाणी भरून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी ते पाणी घेत नसत़ त्यानंतर त्याने कंटाळून हजरत उस्मान गणी रजि़ यांना ती पूर्ण विहीर विकली़ आणि त्या शहरात पाणी मोफत दिले़ ती विहीर आजही सौदीअरबमधील मदिना शहरात आहे. आज टंचाई आहे. विकत नाही, तर मोफत पाणी दिले पाहिजे, असे मौलाना मुफ्ती अब्दुल जलील म्हणाले.