शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

एटीएसने पकडलेला एक साधक औरंगाबाद जिल्ह्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:15 IST

मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद/औरंगाबाद : मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.शरद कळसकर (२५,रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शरदला अटक केल्याची माहिती मुंबई एटीएसने त्याच्या नातेवाईकांना फोन करून दिली. त्याच्यावरील आरोप काय, हे मात्र पोलिसांनी सांगितले नसल्याचे त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले की, शरदचे प्राथमिक शिक्षण केसापुरीत झाले. अकरावी, बारावीसाठी तो औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालयात होता. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. चार वर्षांपूर्वी तो चांगले शिक्षण घेतो आणि कामधंदा शोधतो, असे सांगून घरातून गेला होता. तो एप्रिल महिन्यात नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा कोल्हापूरला गेला. लेथ मशीन फिटरचे काम करीत असल्याचे त्याने घरी सांगितले होते. त्याचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यांना ५ एकर शेतजमीन आहे. त्याची आई, एक लहान भाऊ आणि विवाहित मोठी बहीण शेती व्यवसाय करतात. शरदचे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी संबंधित असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून समजली. एटीएसच्या अधिकाऱ्यांचे पथक आज सकाळी केसापुरी येथे जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या अधिकाºयांनी याबाबत मात्र दुजोरा दिला नाही.मोबाईल वापरत नव्हताच्शरद हा मोबाईल वापरत नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये तो साधना नावाच्या कंपनीत कामाला होता, असे त्याने घरी सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो सहा-सात महिन्यांतून एकदा गावी यायचा. त्यावेळी दहा ते पंधरा हजार रुपये आई-वडिलांना देऊन परत जात. कोल्हापुरात स्वत:चा उद्योग उभारायचा असे त्याने घरी सांगितले होते. मात्र, त्याला पकडल्याचे कळल्याने नातेवाईकांना धक्काच बसला. एटीएसने पकडलेला एक साधक औरंगाबाद जिल्ह्यातीललोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद/औरंगाबाद : मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.शरद कळसकर (२५,रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शरदला अटक केल्याची माहिती मुंबई एटीएसने त्याच्या नातेवाईकांना फोन करून दिली. त्याच्यावरील आरोप काय, हे मात्र पोलिसांनी सांगितले नसल्याचे त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले की, शरदचे प्राथमिक शिक्षण केसापुरीत झाले. अकरावी, बारावीसाठी तो औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालयात होता. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. चार वर्षांपूर्वी तो चांगले शिक्षण घेतो आणि कामधंदा शोधतो, असे सांगून घरातून गेला होता. तो एप्रिल महिन्यात नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा कोल्हापूरला गेला. लेथ मशीन फिटरचे काम करीत असल्याचे त्याने घरी सांगितले होते. त्याचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यांना ५ एकर शेतजमीन आहे. त्याची आई, एक लहान भाऊ आणि विवाहित मोठी बहीण शेती व्यवसाय करतात. शरदचे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी संबंधित असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून समजली. एटीएसच्या अधिकाºयांचे पथक आज सकाळी केसापुरी येथे जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या अधिकाºयांनी याबाबत मात्र दुजोरा दिला नाही.मोबाईल वापरत नव्हताच्शरद हा मोबाईल वापरत नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये तो साधना नावाच्या कंपनीत कामाला होता, असे त्याने घरी सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो सहा-सात महिन्यांतून एकदा गावी यायचा. त्यावेळी दहा ते पंधरा हजार रुपये आई-वडिलांना देऊन परत जात. कोल्हापुरात स्वत:चा उद्योग उभारायचा असे त्याने घरी सांगितले होते. मात्र, त्याला पकडल्याचे कळल्याने नातेवाईकांना धक्काच बसला.