शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एटीएसने पकडलेला एक साधक औरंगाबाद जिल्ह्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:15 IST

मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद/औरंगाबाद : मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.शरद कळसकर (२५,रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शरदला अटक केल्याची माहिती मुंबई एटीएसने त्याच्या नातेवाईकांना फोन करून दिली. त्याच्यावरील आरोप काय, हे मात्र पोलिसांनी सांगितले नसल्याचे त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले की, शरदचे प्राथमिक शिक्षण केसापुरीत झाले. अकरावी, बारावीसाठी तो औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालयात होता. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. चार वर्षांपूर्वी तो चांगले शिक्षण घेतो आणि कामधंदा शोधतो, असे सांगून घरातून गेला होता. तो एप्रिल महिन्यात नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा कोल्हापूरला गेला. लेथ मशीन फिटरचे काम करीत असल्याचे त्याने घरी सांगितले होते. त्याचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यांना ५ एकर शेतजमीन आहे. त्याची आई, एक लहान भाऊ आणि विवाहित मोठी बहीण शेती व्यवसाय करतात. शरदचे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी संबंधित असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून समजली. एटीएसच्या अधिकाऱ्यांचे पथक आज सकाळी केसापुरी येथे जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या अधिकाºयांनी याबाबत मात्र दुजोरा दिला नाही.मोबाईल वापरत नव्हताच्शरद हा मोबाईल वापरत नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये तो साधना नावाच्या कंपनीत कामाला होता, असे त्याने घरी सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो सहा-सात महिन्यांतून एकदा गावी यायचा. त्यावेळी दहा ते पंधरा हजार रुपये आई-वडिलांना देऊन परत जात. कोल्हापुरात स्वत:चा उद्योग उभारायचा असे त्याने घरी सांगितले होते. मात्र, त्याला पकडल्याचे कळल्याने नातेवाईकांना धक्काच बसला. एटीएसने पकडलेला एक साधक औरंगाबाद जिल्ह्यातीललोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद/औरंगाबाद : मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.शरद कळसकर (२५,रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शरदला अटक केल्याची माहिती मुंबई एटीएसने त्याच्या नातेवाईकांना फोन करून दिली. त्याच्यावरील आरोप काय, हे मात्र पोलिसांनी सांगितले नसल्याचे त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले की, शरदचे प्राथमिक शिक्षण केसापुरीत झाले. अकरावी, बारावीसाठी तो औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालयात होता. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. चार वर्षांपूर्वी तो चांगले शिक्षण घेतो आणि कामधंदा शोधतो, असे सांगून घरातून गेला होता. तो एप्रिल महिन्यात नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा कोल्हापूरला गेला. लेथ मशीन फिटरचे काम करीत असल्याचे त्याने घरी सांगितले होते. त्याचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यांना ५ एकर शेतजमीन आहे. त्याची आई, एक लहान भाऊ आणि विवाहित मोठी बहीण शेती व्यवसाय करतात. शरदचे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी संबंधित असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून समजली. एटीएसच्या अधिकाºयांचे पथक आज सकाळी केसापुरी येथे जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या अधिकाºयांनी याबाबत मात्र दुजोरा दिला नाही.मोबाईल वापरत नव्हताच्शरद हा मोबाईल वापरत नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये तो साधना नावाच्या कंपनीत कामाला होता, असे त्याने घरी सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो सहा-सात महिन्यांतून एकदा गावी यायचा. त्यावेळी दहा ते पंधरा हजार रुपये आई-वडिलांना देऊन परत जात. कोल्हापुरात स्वत:चा उद्योग उभारायचा असे त्याने घरी सांगितले होते. मात्र, त्याला पकडल्याचे कळल्याने नातेवाईकांना धक्काच बसला.