शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएसने पकडलेला एक साधक औरंगाबाद जिल्ह्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:15 IST

मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद/औरंगाबाद : मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.शरद कळसकर (२५,रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शरदला अटक केल्याची माहिती मुंबई एटीएसने त्याच्या नातेवाईकांना फोन करून दिली. त्याच्यावरील आरोप काय, हे मात्र पोलिसांनी सांगितले नसल्याचे त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले की, शरदचे प्राथमिक शिक्षण केसापुरीत झाले. अकरावी, बारावीसाठी तो औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालयात होता. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. चार वर्षांपूर्वी तो चांगले शिक्षण घेतो आणि कामधंदा शोधतो, असे सांगून घरातून गेला होता. तो एप्रिल महिन्यात नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा कोल्हापूरला गेला. लेथ मशीन फिटरचे काम करीत असल्याचे त्याने घरी सांगितले होते. त्याचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यांना ५ एकर शेतजमीन आहे. त्याची आई, एक लहान भाऊ आणि विवाहित मोठी बहीण शेती व्यवसाय करतात. शरदचे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी संबंधित असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून समजली. एटीएसच्या अधिकाऱ्यांचे पथक आज सकाळी केसापुरी येथे जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या अधिकाºयांनी याबाबत मात्र दुजोरा दिला नाही.मोबाईल वापरत नव्हताच्शरद हा मोबाईल वापरत नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये तो साधना नावाच्या कंपनीत कामाला होता, असे त्याने घरी सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो सहा-सात महिन्यांतून एकदा गावी यायचा. त्यावेळी दहा ते पंधरा हजार रुपये आई-वडिलांना देऊन परत जात. कोल्हापुरात स्वत:चा उद्योग उभारायचा असे त्याने घरी सांगितले होते. मात्र, त्याला पकडल्याचे कळल्याने नातेवाईकांना धक्काच बसला. एटीएसने पकडलेला एक साधक औरंगाबाद जिल्ह्यातीललोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद/औरंगाबाद : मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.शरद कळसकर (२५,रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शरदला अटक केल्याची माहिती मुंबई एटीएसने त्याच्या नातेवाईकांना फोन करून दिली. त्याच्यावरील आरोप काय, हे मात्र पोलिसांनी सांगितले नसल्याचे त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले की, शरदचे प्राथमिक शिक्षण केसापुरीत झाले. अकरावी, बारावीसाठी तो औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालयात होता. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. चार वर्षांपूर्वी तो चांगले शिक्षण घेतो आणि कामधंदा शोधतो, असे सांगून घरातून गेला होता. तो एप्रिल महिन्यात नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा कोल्हापूरला गेला. लेथ मशीन फिटरचे काम करीत असल्याचे त्याने घरी सांगितले होते. त्याचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यांना ५ एकर शेतजमीन आहे. त्याची आई, एक लहान भाऊ आणि विवाहित मोठी बहीण शेती व्यवसाय करतात. शरदचे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी संबंधित असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून समजली. एटीएसच्या अधिकाºयांचे पथक आज सकाळी केसापुरी येथे जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या अधिकाºयांनी याबाबत मात्र दुजोरा दिला नाही.मोबाईल वापरत नव्हताच्शरद हा मोबाईल वापरत नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये तो साधना नावाच्या कंपनीत कामाला होता, असे त्याने घरी सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो सहा-सात महिन्यांतून एकदा गावी यायचा. त्यावेळी दहा ते पंधरा हजार रुपये आई-वडिलांना देऊन परत जात. कोल्हापुरात स्वत:चा उद्योग उभारायचा असे त्याने घरी सांगितले होते. मात्र, त्याला पकडल्याचे कळल्याने नातेवाईकांना धक्काच बसला.