शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

मुलीच्या अंगाची ‘चाळणी’ पाहून जीव तीळ-तीळ तुटतोय

By admin | Updated: December 8, 2015 00:11 IST

औरंगाबाद : आपण ऊसतोडणी करून पोट भरतो. निदान लेकरांच्या वाट्याला तरी हे जगणे येऊ नये म्हणून मानलेल्या बहिणीच्या सांगण्यावरून सारिकाचा विवाह संजय अग्रवाल याच्याशी लावला

औरंगाबाद : आपण ऊसतोडणी करून पोट भरतो. निदान लेकरांच्या वाट्याला तरी हे जगणे येऊ नये म्हणून मानलेल्या बहिणीच्या सांगण्यावरून सारिकाचा विवाह संजय अग्रवाल याच्याशी लावला. पण पाच महिन्यांतच त्याने तिच्या अंगाची चटके देऊन-देऊन पार ‘चाळणी’ केली. आज मुलीच्या शरीरावरील डाग पाहून माझा जीव कासावीस होतोय. त्यांच्या जाचातून मुलगी वाचली, यातच समाधान मानणाऱ्या पीडित सारिकाच्या आईने मुलीला या मरणयातना पोहोचविणाऱ्या अग्रवाल कुटुंबियांना कडक शासन व्हावे, अशी भावना ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. मूळच्या काळवटी तांडा (ता.अंबाजोगाई) येथील रहिवासी असलेल्या सारिकाच्या आई बारकूबाई जाधव या रविवारी संध्याकाळी औरंगाबादेत आल्या. घाटीत त्यांनी मुलीची अवस्था पाहिली. सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही काही महिन्यांपूर्वी कामानिमित्त परभणीला गेलो होतो. सोबतीला भाऊ विठ्ठल पवार होता. तेथेच सुवर्णा शिवाजी वंजारे हिच्याशी ओळख झाली. रोजच्या ओळखीमुळे विठ्ठल पवार यांनी सुवर्णा हिला ‘गुरूबहीण’ मानले. त्यामुळे सारिका तिला मावशी मानत होती. तिच्या ओळखीनेच सारिकाचा संजयशी विवाह करण्यात आला होता. घरच्या गरिबीमुळे मोठी सोयरिक पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे सारिकाचे लग्न होतेय, यातच आम्ही समाधानी होतो. लग्नानंतर दोन दिवस सारिकाचे मामा विठ्ठल यांनीही मिसारवाडीत तिच्या घरी राहून सर्व परिस्थिती जाणून घेतली होती. दोन दिवस ते अतिशय चांगले वागले. जसे पाहुणे घरातून गेले, तसा त्यांनी छळ करायला सुरुवात केली. हळूहळू राहते घर छळछावणीच होऊन बसले.